राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान राॅयल्स या दोन संघांमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामातील १३ वा सामना पार पडला. ज्यामध्ये आरसीबीने राजस्थानला ४ विकेट्सने पराभूत केले. बेंगलोर संघाचा हा आयपीएलमधील १०० वा विजय होता. बेंगलोर संघाच्या विजयाचा हिरो ठरले दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद. या सामन्यात दिनेशने नाबाद ४४, तर शाहबाजने ४५ धावा केल्या. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यातील विजयानंतर फाफ डू प्लेसिसने कार्तिक आणि शाहबाज यांचे कौतुक केले आहे.
डू प्लेसिस (Faf Du Plessis) सामन्यानंतर म्हणाला, “हा एक शानदार सामना होता. अशा सामन्यांमध्ये दुसऱ्या संघाकडून परत घेण्यासाठी दिनेश कार्तिकसारख्या खेळाडूंची गरज आहे, जे अशावेळी आपली वैशिष्ट्य दाखवू शकतील. दबावात सुद्धा तो खूप शांत होता. त्याच्यासारख्या महत्त्वाच्या खेळाडूची आम्हाला गरज आहे. आम्ही गोलंदाजी देखील चांगली केली, परंतु जाॅसने १९ व्या षटकात उत्तम फलंदाजी केली आणि संघाला सन्मानकारक धावसंख्या करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आमची तशी सुरुवात झाली नाही, जशी आम्हाला हवी होती. परंतु, आम्हाला विश्वास होता की, आम्ही सामना जिंकू शकतो.”
तसेच शाहबाजबद्दल बोलताना तो म्हणाला, “शाहबाजकडे त्याचा गेमप्लॅन आहे. लोक विचार करतात की तो (शाहबाज) एक छोटा खेळाडू आहे, त्यामुळे तो जास्त दूरपर्यंत शाॅट खेळू शकत नाही. परंतु, तो खुप लांबपर्यंत चेंडू पाठवू शकतो. कारण चेंडू आोला होता आणि डाव्या हाताचा फलंदाज क्रिजवर उपलब्ध होता, त्यामुळे मंगळवारी त्याला गोलंदाजी करु दिली नाही. परंतु, तो भविष्यात गोलंदाजीत सुद्धा योगदान देऊ शकतो.”
या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने २० षटकात ३ विकेट्स गमावत १६९ धावा केल्या. जाॅस बटलरने सर्वाधिक ७० धावा करत संघाला मोठी धावसंख्या करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे १७० धावांचे लक्ष्य आरसीबीने ६ विकेट्स गमावत ५ चेंडू राखून गाठले. राजस्थान संघ पराभवानंतर देखील गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे, तर आरसीबी सहाव्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एकवेळ अशी आलेली की, रिषभ पंतने मित्र आणि कुटुंबियांशी सोडले होते बोलणे, वाचा कारण
Video : आधी विराट मग सिराज नंतर सगळेच, वानखेडेवर RCBचे भिडू लागले नाचू