दर चार वर्षांनी खेळला जाणारा विश्वचषक यावर्षी भारतात खेळला जाणार आहे. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक 2023 स्पर्धेचे आयोजन होणार आहे. घरच्या मैदानांवर खेळणाऱ्या भारतीय संघाला विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, 2011 साली विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग असलेल्या माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याचे मत वेगळे आहे. भारत घरच्या मैदानावर विश्वचषक 2023 जिंकू शकेल की नाही, याची त्याला खात्री नाहीये.
एका युट्यूब चॅनेलशी बोलताना युवराज सिंग (Yuvraj Singh) याने मोठे विधान केले. यावेळी त्याला भारताच्या 2023 विश्वचषक जिंकण्याच्या शक्यतेविषयी विचारण्यात आले. यावर तो म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर मला खात्री नाहीये की, ते विश्वचषक जिंकतील की नाही. मी एक देशभक्तासारखे म्हणू शकतो की, भारत जिंकेल. मात्र, मला दिसते की, भारताच्या मधल्या फळीत दुखापतींविषयी चिंता आहे.”
रोहितला संघाच्या संयोजनावर द्यावे लागेल लक्ष
भारतीय क्रिकेट संघाच्या मागील दहा वर्षांतील चढ-उतारांविषयी विचारल्यावर युवराज म्हणाला की, “भारताला विश्वचषक न जिंकताना पाहणे निराशाजनक आहे. मात्र, असेच आहे. आपल्याकडे एक समंजस्य कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याने आपल्या संयोजनावर लक्ष दिले पाहिजे. आपल्याला तयार होण्यासाठी काही सामन्यांची गरज आहे. 15 जणांचा एक संघ निवडण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी 20 खेळाडूंचा एक गट असला पाहिजे.”
मधली फळी व्यवस्थित करण्याची गरज
युवराजनुसार विश्वचषकापूर्वी भारताची वरची फळी चांगली आहे. मात्र, मधली फळी व्यवस्थित करण्याची गरज आहे. चौथा आणि पाचवा क्रम खूप महत्त्वाचा आहे. जर रिषभ पंत आयपीएल फ्रँचायझीसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे, तर त्याने राष्ट्रीय संघासाठीही चौथ्या क्रमांकावर खेळले पाहिजे. चौथ्या क्रमांकावरील फलंदाज वेगवान धावा करणारा नसू शकतो, त्याला असा व्यक्ती असणे आवश्यक आहे, जो दबाव पेलू शकेल.
रिंकू सिंगला संधी देण्याची मागणी
यावेळी त्याने एक सल्लाही दिला की, भारतीय संघ बादफेरीतील सामन्यांप्रमाणे दबावातील सामने खेळताना प्रयोग करू शकत नाही. आदर्श चौथ्या क्रमांकाविषयी बोलताना युवराजने केएल राहुल याचे नाव सुचवले. तसेच, त्याने या स्थानासाठी रिंकू सिंग (Rinku Singh) याचेही नाव घेतले. तो म्हणाला की, “रिंकू सिंग वास्तवात चांगली फलंदाजी करत होता. मला वाटते की, त्याच्यात भागीदारी बनवण्याची आणि स्ट्राईक रेट कायम ठेवण्याची समज आहे, हे खूप घाईचे आहे. जर तुम्हाला त्याला संघात घ्यायचे असेल, तर त्याला पुरेसे सामन्यात खेळवावे लागेल.”
यावेळी युवराजने मजेशीर अंदाजात म्हटले की, “मला वाटते की, मी एक चांगला प्रशिक्षक बनेल. मात्र, यासाठी तुम्हाला सिस्टीममध्ये राहावे लागेल.”
युवराजला भारतीय क्रिकेटसाठी आशा आहेत की, माजी क्रिकेटपटू अजित आगरकर हा निवड समितीच्या अध्यक्षाच्या रूपात एक चांगली निवड आहे. विशेष म्हणजे, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच, स्पर्धेच्या अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (former allround yuvraj singh on world cup 2023 said this know here)
महत्वाच्या बातम्या-
हसरंगा बनला जून 2023चा प्लेअर ऑफ द मंथ, गार्डनरने रचला इतिहास
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 12: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला ‘मुनाफ पटेल’