यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतानं चमकदार कामगिरी केली आणि सेमीफायनल मध्ये धडक मारली. सेमीफायनल 2 मध्ये भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. (27 जून) रोजी दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. इंग्लंडनं शेवटच्या टी20 विश्वचषकात सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. परंतू यावेळी भारतीय संघ हरणार नाही, इंग्लंडला जिंकायचं असेल तर त्यांना धमाकेदार कामगिरी करावी लागेल. असं माजी इंग्लंड खेळाडू पॉल कॉलिंगवूडनं म्हटलं आहे.
पॉल कॉलिंगवूडनं (Paul Collingwood) स्टार स्पोर्ट्स शोमध्ये भारताचं जोरदार कौतुक केलं. तो म्हणाला, “यावेळी भारत उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंनी भरलेला संघ आहे. त्यामध्ये जसप्रीत बुमराह, सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे तो धोकादायक आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार तो वेगवान गोलंदाजी करत आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, जर तुमच्याकडं बुमराहसारखा घातक गोलंदाज असेल जो 24 चेंडू टाकतो, त्यावेळी खूप फरक पडतो.”
पुढे बोलताना, पॉल कॉलिंगवूड म्हणाला, “भारतीय संघ अमेरिकेच्या कठीण खेळपट्ट्यांवरही मोठ्या आत्मविश्वासानं खेळताना दिसला. त्यांच्याकडे रोहित शर्मासारखा घातक फलंदाज आहे, ज्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक खेळी खेळली. खरं सांगायचं तर मला वाटत नाही की यावेळी भारतीय संघ हरेल. भारताला हरवण्यासाठी इंग्लंडला खूप कष्ट घ्यावे लागतील.”
यंदाच्या आयसीसी टी20 विश्चचषकात भारतानं धमाकेदार कामगिरी केली आहे. भारत या स्पर्धेत अपराजित संघ राहिला आहे. भारतानं 7 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 1 सामना पावसानं खोळंबा घातल्यामुळे रद्द करण्यात आला. इंग्लंडबद्दल बोलायचं झालं तर इंग्लंडनं 7 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर 1 सामना अनिर्णीत राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हिटमॅननं रचला इतिहास, याबाबतीत धोनीला मागे टाकत ठरला पहिला भारतीय कर्णधार
ठरलं तर! एक गोष्ट जुळून आली की टीम इंडिया थेट फायनलमध्ये
“क्रिकेट मैदानापासून बॉलीवूडपर्यंत…” युवराज सिंगची डेव्हिड वाॅर्नरसाठी खास पोस्ट