---Advertisement---

Champions Trophy; भारत-पाकिस्तान सामन्यात कोण मारणार बाजी? माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

On: शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2025 9:54 PM
india vs pakistan terror attack
---Advertisement---

आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) स्पर्धा (19 फेब्रुवारी) पासून सुरू झाली. दरम्यान आता चाहते या मेगा स्पर्धेतील हायवोल्टेज सामन्याची वाट पाहत आहे. या मेगा स्पर्धतील हा सामना म्हणजे भारत पाकिस्तास संघांचा. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी (23 फेब्रुवारी) रोजी आमने-सामने असणार आहेत. दरम्यान दोन्ही संघात चुरशीची लढत पाहायला मिळेल. तत्पूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) या सामन्यात बाजी कोण मारेल? याबद्दल वक्तव्य केले आहे.

दुबईमध्ये झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात भारताने एकहाती विजय मिळवला. त्याआधी, भारताच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली, मोहम्मद शमीने (Mohammed Shami) पुनरागमनानंतर आघाडी घेतली आणि 5 विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना गमावला आहे. भारताविरुद्ध त्यांचा आणखी एक पराभव झाल्यानंतर त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावे लागू शकते. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजी संयोजनाबद्दल बोलताना सौरव गांगुली म्हणाले, “या गोलंदाजी संयोजनाने भारतीय संघासाठी उत्तम काम केले आहे. त्यामुळे संघ तीन फिरकीपटू कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलसारख्या गोलंदाजांसह जाईल.”

पुढे बोलताना गांगुली म्हणाले, “हर्षित राणाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, ती खूप चांगली आहे. शमी हा एक अव्वल गोलंदाज आहे आणि हार्दिक पांड्याही चांगली कामगिरी करत आहे. पाकिस्तान संघ फिरकीपटूंना चांगले खेळवत नाही आणि मला वाटते की दुबईच्या खेळपट्टीवर टर्न येईल. त्यामुळे, हे संयोजन भारतासाठी फायदेशीर करार ठरेल.”

गांगुली म्हणाले की, “मी माझ्या कारकिर्दीत पाकिस्तानविरुद्ध अनेक सामने खेळलो आहे ज्याच्या माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत. माझी सर्वोच्च कसोटी धावसंख्याही पाकिस्तानविरुद्धच होती. पाकिस्तानने भारताविरुद्ध शेवटच्या चेंडूवर जिंकल्यावर जावेद मियांदादचा तो षटकारही मी पाहिला आहे आणि त्यानंतर मी भारतीय संघात झालेला बदलही पाहिला आहे, जिथे भारताने खेळाच्या प्रत्येक स्वरूपात पाकिस्तानला हरवले. गेल्या 10-15 वर्षांचा विचार केला तर भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूपच चांगला संघ बनला आहे.”

शेवटी बोलताना गांगुली म्हणाले की, “दुबईमध्ये फलंदाजी करणे पाकिस्तानइतके सोपे नसेल. न्यूझीलंडने पाकिस्तानमध्ये 300 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या, जे दुबईमध्ये शक्य होणार नाही. असे असूनही, विरोधी संघांना भारताला हरवणे खूप कठीण जाईल. त्यामुळे पाकिस्ताविरूद्धच्या सामन्यात भारताचे पारडे जड आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

RCB vs MI: एलिसे पेरीचे झंझावाती अर्धशतक! मुंबईसमोर 168 धावांचे आव्हान
क्रिकेटप्रेमी सज्ज! चॅंपियन्स ट्रॉफीमध्ये होणार चुरशीची लढत
मोहम्मद शमीने उलगडले ‘फ्लाइंग किस’ सेलिब्रेशनचे रहस्य, रोहित शर्मा आणि गौतम गंभीरचा होता पाठिंबा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---