यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातून (ICC T20 World Cup) पाकिस्तान संघ सुपर 8च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पाकिस्ताननं यंदाच्या टी20 विश्वचषकातील साखळीफेरीचा अंतिम सामना आयर्लंडविरुद्ध खेळला. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान काही खास कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर वारंवार प्रश्व उपस्थित होत होते. परंतु मधूनच भारतीय संघाचे माजी सलामीवीर कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी बाबर आझमला टी20 क्रिकेट न खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
बाबर आझम (Babar Azam) सध्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा जगातील नंबर 1 फलंदाज आहे. परंतु त्याच्या स्ट्राईक रेटवर नेहमी प्रश्न उपस्थित राहत असतात. या कारणामुळे पाकिस्ताननं टी20 विश्वचषकाच्या दरम्यान सॅम अयूबला संघात शामिल केलं होतं. जेणेकरुन तो गतीनं धावा करेल आणि बाबर आझम 3 नंबरला फलंदाजी करेल.
स्टार स्पोर्टशी बाबर आझमविषयी बोलताना कृष्णम्माचारी श्रीकांत म्हणाले की, “बाबर आझमनं टी20 क्रिकेट खेळावे असे मला वाटत नाही. तुम्ही टी20 क्रिकेटमध्ये असे टुक टुक करू शकत नाही. बाबरनं विराट आणि रोहितप्रमाणे 4,000 धावा केल्या, पण त्याचा स्ट्राईक रेट फक्त 112-115 आहे. अशा परिस्थितीत त्यानं एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
बाबर आझमनं (Babar Azam) यंदाच्या टी20 विश्वचषकात आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत आणि 30 च्या सरासरीनं एकूण 90 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट केवळ 104.65 राहिला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला अमेरिकेसारख्या संघाकडूनही पराभवाचा सामना करावा लागला. परंतु बाबर आझमनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना माग टाकलं आहे.
बाबरनं टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 122 सामन्यात 4,113 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये त्यानं 3 शतक तर 36 अर्धशतक झळकावली आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या 122 आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 129.46 राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयर्लंडनं पाकिस्तानसमोर ठेवलं अवघ्या 107 धावांचं आव्हान!
यू मुम्बाने प्रतिभावंत खेळाडू मानव ठक्करला केले रिटेन
पाकिस्ताननं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11