सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेतली. याच वर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात या मालिकेतून झाली. त्यानंतर आता तिरुअनंतपुरम येथे होणाऱ्या अखेरच्या वनडेत भारतीय संघाने काय बदल करावा, याबाबत भारताचा माजी सलामीवीर व समालोचक गौतम गंभीर याने एक सूचना केली आहे.
कोलकाता येथील दुसऱ्या वनडे सामन्यावेळी समालोचन करत असताना मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघात काय बदल व्हावे असा प्रश्न गंभीरला विचारण्यात आला. त्यावर गंभीर म्हणाला,
“माझ्यामध्ये फलंदाजांना तितक्या विश्रांतीची गरज नसते. अखेरच्या सामन्यासाठी मी केवळ एक बदल होताना पाहत आहे. मोहम्मद शमी याच्या जागी अर्शदीप सिंग याला संधी देण्यात यावी. कारण शमी हा आपला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत प्रमुख गोलंदाज असेल. तिथे त्याला अधिक गोलंदाजी करावी लागणार आहे. त्यामुळे अखेरचा सामन्यातून त्याला बाहेर केले तरी काही फरक पडणार नाही.”
तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेतली आहे. गुवाहाटी येथे झालेल्या पहिला सामन्यात फलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे भारताने 374 धावांचा डोंगर उभारला होता. त्याच्या प्रतिउत्तरात श्रीलंका संघ 67 धावांनी पिछाडीवर राहिला. तर कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव 215 धावांवर गुंडाळला होता. भारताने सहा गडी गमावत हे आव्हान पार करत मालिका नावे केली. मालिकेतील अखेरचा सामना तिरुअनंतपुरम येथे रविवारी (15 जानेवारी) खेळला जाईल.
(Gautam Gambhir Suggest Rest Shami And Include Arshdeep For 3rd ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अक्षर पटेलने वाढवले रवींद्र जडेजाचे टेंशन! सामन्यानंतरचे जड्डूचे ट्वीट व्हायरल
हॉकी विश्वचषक 2023: भारत विरुद्ध स्पेन सामना कुठे पाहणार? संघ, रेकॉर्ड्स जाणून घ्या एकाच क्लिकवर