साउथ आफ्रिकेच्या संघाने सुपर ८ च्या सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध अप्रतिम कामगिरी करत ९ गड्यांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासोबतच साउथ आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. संघ आता पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. साउथ आफ्रिकेसाठी हा विजय जेवढा महत्त्वाचा होता, तेवढाच तो भारतासाठीही महत्त्वाचा होता. आफ्रिकन संघाच्या विजयाने भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला आहे.
टीम इंडियासाठी आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संघाला आता सुपर ८ मधील आपल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवावा लागेल, ज्यामुळे थेट सेमीफायनलमधील स्थान पक्के होईल. वेस्ट इंडीजच्या या मोठ्या पराभवामुळे त्यांच्या नेट रन रेटमध्येही मोठी घसरण झाली आहे, ज्याचा थेट फायदा टीम इंडियाला होणार आहे.






