महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम मुंबई इंडियन्सने जिंकला. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने पहिल्यां डब्ल्यूपीएल हंगामाचे विजेतेपद पटकावले. डब्लूपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर हरमनप्रीतने खास प्रतिक्रिया दिली. मागच्या मोठ्या काळापासून डब्ल्यूपीएल ट्रॉफी उंचावण्याची वाट पाहत होते, असे हरमनप्रीतने म्हटले. आगामी डब्ल्यूपीएल हंगामात देखील त्यांचा संघ अशाच प्रकारे चांगले प्रदर्शन करेल, असे हरमनप्रीत म्हणाली. यावेळी तिने संघातील युवा खेळाडूंचेही कौतुक केले.
हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) म्हणाली की, “यावर्षी अनेक युवा खेळाडूंनी खास प्रभावित केले. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारांना विश्वास आहे की, या युवा खेळाडू देशासाठीही चांगले प्रदर्शन करतील. या खेळाडू राष्ट्रीय संघासाठी आपले 100 टक्के योगदान देतील.” दिल्ली कॅपिटल्सला अंतिम सामन्यात पराभूत करण्याचा अनुभव देखील हरमनप्रीतने मांडला. “आम्ही प्रथम गोलंदाजीला आल्यानंतर आम्ही कोणत्याही सर्वबाद करू शकतो, हे माहीत होते. आपण जी रणनीती आखली आहे, त्यावर काम करणे, एक गोलंदाज म्हणून महत्वाचे असते.”
हरमनप्रीतच्या मते चालू सामन्यात जर गोलंदाजीची रणनीती बदलली तर सर्वोत्तम प्रदर्शन देता येत नाही, हरमनप्रीतला वाटते. गौलंदाजांचे कौतुक करत हरमनप्रीत म्हणाली, “टूर्नामेंटमध्ये आमच्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. खासकरून गोलंदाजांनी. आमच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विरोधी फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या.” हरमनप्रीतने पुढे असेही सांगितले की अंतिम सामन्यासारख्या महत्वाच्या सामन्यांमध्ये शांत डोक्याने निर्णय घ्यावे लागतात. जर असे केले नाही, तर घेतलेले निर्णय आपल्याच संघावर भारी पडू शकतात. तुमच्याकडे गुणवत्ता असलीच पाहिजे, पण रणनीतीवर काम करणे त्यापेक्षा महत्वाचे आहे, असेही हरमप्रीत म्हणाली.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 131 धावा केल्या. प्रत्युत्तार मुंबई इंडियन्सने 19.3 षटकात 3 विकेट्सच्या नुकसानावर 134 धावा केल्या आणि सामना जिंकला. (Harmanpreet Kaur praised the young players after winning the WPL trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटपटू केदार जाधव याच्या वडिलांबाबत धक्कादायक ब्रेकिंग!
मुंबई इंडियन्सच्या विजयाला वादाची काळी किनार! शफालीला बाद देण्यावरून उलटसुलट चर्चा सुरू