---Advertisement---

शंभराव्या कसोटीनिमित्त विराट कोहलीचा प्रशिक्षक द्रविडकडून सन्मान, अनुष्काही होती उपस्थित

Virat-Kohli-Felicitate-By-Dravid
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील ऐतिहासिक कसोटी सामना शुक्रवारपासून (०४ मार्च) मोहाली येथे सुरू झाला आहे. हा सामना सर्वार्थाने भारतीय संघासाठी खास आहे. कारण या सामन्यात रोहित शर्मा प्रथमच भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला आहे. तर स्टार फलंदाज विराट कोहली याचा हा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना (Virat Kohli’s 100th Test) आहे. या सुवर्णक्षणी विशेष भेट देऊन विराटचा सन्मान करण्यात आला. या बहुमूल्य क्षणाचे फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय, BCCI) सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

१०० व्या कसोटी सामन्यासाठी मैदानावर उतरण्यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) यांच्या हस्ते विराटचा सन्मान करण्यात (Coach Dravid Felicitate Kohli) आला. द्रविड यांनी विशेष कॅप देत विराटचा सन्मान केला. यावेळी त्यांनी विराटला त्याच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या. ‘विराट तुझा प्रवास शानदार होवो आणि १०० नंतर तू २०० कसोटी सामने खेळावेत,’ अशा शब्दात द्रविडने विराटला शुभेच्छा दिल्या. 

या खास क्षणी विराटसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा हीदेखील उपस्थित होती. विराटला प्रशिक्षक द्रविडने कॅप दिल्यानंतर तिने त्याची गळाभेट घेतली. याबरोबरच विराटने सन्मान झाल्यानंतर भावुक होत प्रतिक्रियाही दिली आहे. 

हेही वाचा- “कधी वाटले नव्हते १०० कसोटी खेळेल”; ऐतिहासिक सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट झाला व्यक्त

१०० व्या कसोटीसाठी कॅप मिळाल्यानंतर काय म्हणाला विराट?
कसोटी सामन्यांच्या शंभरेवेळी विशेष कॅप मिळाल्यानंतर विराट खूप खुश दिसून आला. तो म्हणाला की, “आज मला आणि माझ्या कुटुंबाला खूप अभिमान वाटत आहे. त्यातही राहुल द्रविड यांच्याकडून कॅप मिळणे, ही अजून जास्तच सन्मानाची गोष्ट होती. कारण मी बालपणी त्यांना खेळताना पाहात मोठा झालो आहे.”

विराट कसोटींची शंभरी करणारा १२ वा भारतीय खेळाडू
विशेष म्हणजे, विराट कसोटी सामन्यांचे शतक करणारा भारताचा १२ वा खेळाडू आहे. त्याच्यापूर्वी भारतीय संघाकडून १०० कसोटी सामने खेळणारे खेळाडू म्हणजे सुनील गावसकर. त्यांनी १९८४ साली लाहोर येथे आपला १०० वा कसोटी सामना खेळला होता. गावसकरांनंतर दिलीप वेंगसरकर यांनी १९८८ साली मुंबई येथे आपला १०० वा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर कपिल देव यांनी १९८९ साली कराचीमध्ये, सचिन तेंडुलकरने २००२ साली ओव्हलमध्ये, अनिल कुंबळेने २००५ साली अहमदाबादमध्ये, राहुल द्रविडने २००६ साली विदर्भमध्ये, सौरव गांगुलीने २००७ साली मेलबर्नमध्ये, व्हीव्हीएस लक्ष्मणने २००८ साली नागपूरमध्ये, वीरेंद्र सेहवागने २०१२ साली मुंबईमध्ये, हरभजन सिंगने २०१३ साली चेन्नईमध्ये आणि ईशांत शर्माने २०२१ साली अहमदाबादमध्ये आपला १०० वा कसोटी सामना खेळला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: एस श्रीसंतला तब्बल ९ वर्षांनंतर मिळाली रणजी विकेट, भावूक होऊन खेळपट्टीवर घातले लोटांगण

मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचे दिग्गज यष्टीरक्षक काळाच्या पडद्याआड, यष्टीमागे घेतलेल्या ४३९ विकेट्स

गुणवंत खेळाडू तयार करण्यासाठी हनुमा विराहीने उचलली जबाबदारी, दिली ‘एवढ्या’ लाखांची देणगी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---