मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयची सत्ता हाती घेऊन आता दहा महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. परंतु माजी खेळाडूंच्या परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नाही.
क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाचे (आयसीए) अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी सोमवारी बीसीसीआयवर टीका केली की, दहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे आणि आता वेळ आली आहे की, माजी खेळाडूंच्या मागण्यांची दखल मंडळाने घ्यावी.
अशोक मल्होत्रा यांच्या मते संघातील सर्वात जुने खेळाडू कायमची प्रतीक्षा करू शकत नाहीत. बीसीसीआयने आता बऱ्याच दिवसांपासून केलेल्या मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे. दरम्यान, आयसीएच्या संचालकांनी अशोक मल्होत्रा यांच्यावर असा आरोप लावला की, सल्लामसलत न करता जाहीरपणे विधाने करतात.
आयसीएने बीसीसीआयसमोर अश्या मागण्या केल्या आहेत की, 25 पेक्षा कमी प्रथम श्रेणी सामने खेळणार्या माजी खेळाडूंना पेन्शन, माजी क्रिकेटपटूच्या विधवा पत्नीस पेन्शन, वैद्यकीय विम्याची रक्कम 5 लाखांवरून 10 लाखांपर्यंत वाढवावी.
विशेष म्हणजे सामना फिक्सिंगच्या आरोपासाठी मनोज प्रभाकर यांच्यावर बंदी घालण्यात आली होती आणि त्यानंतर 2005 मध्ये त्यांच्यावरील बंदी संपुष्टात आली. अशोक मल्होत्रा यांनी बीसीसीआयला आपल्या मागण्यांबद्दल आठवण करून दिली आणि म्हणाले की, आता वेळ आली आहे की त्यांनी प्रभाकर यांच्याकडे लक्ष द्यावे.
ते म्हणाले, ”सौरव गांगुली यांनी बीसीसीआयची सूत्रे हाती घेतल्यानंतर जवळपास दहा महिने झाले आहेत, परंतु माजी खेळाडूंसाठी काहीही झाले नाही. माजी क्रिकेटपटूंच्या हितासाठी आयसीएची स्थापना केली गेली आणि त्यातील बरेच लोक 70 वर्षाचे झाले आहेत. ते कायमची प्रतीक्षा करू शकत नाहीत. मी पुन्हा या मागण्यांकडे लक्ष देण्याची विनंती बीसीसीआयला करत आहे.”
अशोक मल्होत्रा यांनी प्रसिद्ध केलेल्या नवीन व्हिडिओपासून वाद निर्माण झाला आहे, ज्यामध्ये ते म्हणाले की, स्थानिक क्रिकेट आणि बिहार क्रिकेटमधील सध्याच्या प्रशासकीय गोंधळाची आपल्याला चिंता नाही.





