मुंबई । 1 ऑगस्ट 2019 पासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात झाली आहे. या टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये टॉप नऊ संघांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येक संघाला दोन वर्षात सहा कसोटी मालिका खेळाव्या लागणार आहे. झिम्बाब्वे अफगाणिस्तान आयर्लंड यांच्याजवळ आयसीसीचा कसोटी दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु हे संघ टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सध्या खेळू शकत नाही.
सर्वच संघांना सहा मालिकेतील तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन विदेशात खेळावे लागणार आहे. 2021 या वर्षी टॉपवर राहणाऱ्या दोन संघांमध्ये जून महिन्यात लॉर्डसच्या मैदानावर अंतिम सामना होणार आहे. भारत या गुणतालिकेमध्ये 9 सामन्यांमध्ये 7 विजय आणि 2 पराजयासह 360 गुण मिळवत पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 10 सामन्यात विजय मिळवत 296 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा 2 सामन्यात पराभव झाला आहे तर 1 सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरले.
1- भारत- (9 सामने 7 विजय 2 पराजय 360 गुण)
2- ऑस्ट्रेलिया- (10 सामने 7 विजय 2 पराभव 1 ड्रॉ 296 अंक)
3- न्यूजीलैंड- (7 सामने 3 विजय 4 पराभव 180 गुण)
4- इंग्लैंड- (10 सामने 5 विजय 4 पराभव 1 ड्रॉ 146 गुण)
5- पाकिस्तान- (5 सामने 2 विजय 2 पराभव 1 ड्रॉ, 140 गुण)
6- श्रीलंका- (4 सामने 1 विजय 2 पराभव 1 ड्रॉ, 80 गुण)
7- वेस्टइंडीज- (3 सामने 1 विजय 2 पराभव 40 गुण)
8- दक्षिण अफ्रीका- (7 सामने 1 विजय 6 पराभव 24 गुण)
9- बांग्लादेश- (3 सामने 3 पराभव 0 गुण)