कोविड-19 मुळे इंडियन प्रीमियर लीग 2021चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. यानंतर उरलेल्या हंगामाचे आयोजन हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढील (बीसीसीआय) सर्वात मोठे आव्हान बनले आहे. बीसीसीआय आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) तीन मैदानांवर करण्याच्या विचारात आहे. परंतु युएईत आयपीएल झाल्यास आगामी टी20 विश्वचषकाचे आयोजन धोक्यात येऊ शकते.
यूएईमध्ये फक्त तीन मैदाने आहेत आणि या मैदानांवर सलग सामने खेळवले जाऊ शकत नाहीत. खरे तर, 1 जूनपासून पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित 20 सामने अबुधाबीमध्ये खेळले जाणार आहेत. जर पीएसएलचे आयोजन सुरळीतपणे पार पडले, तर आयपीएलचे उर्वरित 31 सामनेसुद्धा यूएईच्या दुबई, शारजाह, अबुधाबी या मैदानावर घेतले जातील.
त्याचबरोबर जर कोरोनामुळे टी-20 विश्वचषक सामने भारतात न घेता यूएईमध्ये घ्यावे लागले; तर युएईच्या मैदानांवर तब्बल 96 सामन्यांचे लागोपाठ नियोजन करणे अशक्य जाईल. टी20 विश्वचषक 2021मध्ये एकूण 45 सामने खेळवले जातील.
बीसीसीआयचे जरी पीएसएलच्या उर्वरित 20 सामन्यांकडे लक्ष नसले. तरीही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आयपीएल 2021चे 31 सामने आणि टी20 विश्वचषकचे 45 सामने त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. अशात एखाद्यावेळी युएईच्या तीन मैदानांवर तीन महिन्यात एकूण 76 सामने होणे शक्य होईल. परंतु सामन्यासाठी खेळपट्टी तयार करणे खूप अवघड जाऊ शकते. जर सलग या मैदानांवर सामने खेळवले गेले, तर खेळपट्टीचा दर्जा खालावू शकतो. यामुळे सामना खेळताना उत्साह देखील राहणार नाही. असे यापुर्वी आयपीएल 2020मध्ये झाले होते.
आयपीएल 2020 मध्ये शारजाहच्या छोट्या मैदानावर सुरुवातीचे काही सामने सोडले; तर खूप कमी सामन्यात 200 किंवा त्यापेक्षा जास्त धावा झाल्या होत्या. अशातच जर टी-20 विश्वचषक सामन्यांमध्ये कमी धावा झाल्या. तर घरुन बसून विश्वचषकाचा आनंद घेणारे सर्व चाहते नाराज होतील. इतकेच नव्हे तर, आयसीसीला ही गोष्ट चालायची नाही.
अशातच बीसीसीआयला विश्वचषक सामन्यांचे आयोजन भारतातच करावे लागू शकते. त्यामुळे आता हे पाहणे महत्त्वाचे असेल की, आयसीसी कोणत्या दृष्टीने विचार करून टी20 विश्वचषक 2021 बद्दल निर्णय घेईल. त्याचबरोबर बीसीसीआयचा देखील काय निर्णय असेल? हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंतचा कमाल स्टंट; WTC फायनल गाजवण्यासाठी रिषभ ‘असा’ करतोय मेहनत
भारताविरुद्धच्या मालिकेतून जोफ्रा आर्चरची माघार? ‘या’ कारणासाठी घेणार निर्णय
ना धोनी ना सचिन; वनडेत चक्क पळत १०० धावा करणारा ‘हा’ आहे एकमेव भारतीय