मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्स (Mumbai Indians vs Gujrat titans) ला 20 धावांनी हरवून क्वालिफायर-2 मध्ये आपले स्थान निश्चित केले. आता (1 जून) रोजी क्वालिफायर-2 मध्ये मुंबईचा सामना पंजाब किंग्जशी होईल. क्वालिफायर-2 चा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहदाबाद येथे खेळला जाईल.(1 जून) रोजी हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. त्याच वेळी, आता प्रश्न असा निर्माण होतो की जर पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामना पावसाने वाया गेला तर कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचेल
क्वालिफायर-2 (Qualifier- 2) साठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात जर पावसामुळे (1 जून) रोजी सामना झाला नाही, तर सामना (2 जून) रोजी पूर्ण होईल. जर राखीव दिवसही पावसामुळे वाया गेला तर त्या परिस्थितीत सामना रद्द केला जाईल. अशा प्रकारे, आयपीएल 2025 च्या पॉइंट टेबलमध्ये पुढे असलेल्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. या प्रकरणात पंजाब किंग्जला फायदा होईल. पंजाब किंग्ज संघ लीग सामन्यांनंतर पहिल्या क्रमांकावर होता, तर मुंबई चौथ्या क्रमांकावर होता.
अहमदाबादमध्ये क्वालिफायर 2 चे सामने खेळवले जाणार आहेत. (1 जून) रोजी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता जवळजवळ नाही. अॅक्युवेदरच्या मते, (1 जून) रोजी पावसाची 2 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे, (2 जून) रोजी पावसाची 25 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशाप्रकारे, आता हवामान अपडेट पाहता, क्वालिफायर 2 चे सामने (1 जून) रोजी पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई आणि पंजाब किंग्ज (Mumbai Indians and Punjab king’s) यांच्यात एकूण 32 सामने झाले आहेत, ज्यामध्ये पंजाबने 15 सामने जिंकले आहेत, तर मुंबई संघाने 17 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे.






