इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या १५व्या हंगांमात नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाने सर्वांना चकित करून सोडले आहे. पहिल्याच हंगामात गुजरात सध्या पॉईंंट्स टेबलच्या शिखरावर आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामातील साखळी सामने संपून २४ मे पासून प्ले-ऑफच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. गुजरात टायटन्स आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएलचे जेतेपद मिळवण्यापासून केवळ २ सामने दूर आहे. त्यासाठी संघातील ५ महत्त्वाच्या खेळाडूंना विजयाचा भार स्वत:च्या खांद्यावर घ्यावा लागेल. कोण आहेत ते खेळाडू जाणून घेऊ.
१. हार्दिक पांड्या
गुजरातचा कर्णधार म्हणून जबाबदारी मिळालेल्या हार्दिक पांड्याने यंदाच्या हंगामात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. हार्दिकने यंदा ४ अर्धशतकांच्या मदतीने ४०० हुन अधिक धावा बनवल्या आहेत. त्यामुळे उर्वरीत दोन सामन्यांमध्ये हर्दिकला आपले कौशल्य पणाला लावावे लागेल.
२. शुभमन गिल
गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे जाणवत आहे. गुजरातला उर्वरित दोन सामन्यांत फलंदाजी करत असताना चांगल्या सुरुवातीची गरज भासणार आहे. त्यामुळे दोन्ही सामन्यांमध्ये शुभमन गिल महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.
३. राशिद खान
राशिद खान प्रामुख्याने त्याच्या फिरकीसाठी ओळखला जातो. मात्र, यंदा राशिदने आपल्या फलंदाजीने सर्वांना भुरळ पाडली आहे. त्यामुळे राशिदची अष्टपैलू खेळी गुजरातसाठी मदतीची ठरणार आहे.
४. मोहम्मद शमी
गुजरातच्या गोलंदाजीत गती आणणाऱ्या मोहम्मद शमीला उर्वरीत सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करावी लागणार आहे. आत्तापर्यंत शमीने या हंगामात १८ विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत. त्यामुळे अशाच विशेष कामगिरी अपेक्षा सध्या गुजरातचा संघ शमीकडून करत आहे.
५. डेविड मिलर / राहुल तेवतिया
गुजरातकडे यंदाच्या आयपीएलमधील सर्वोतकृष्ट मिडल ऑर्डर आहे अस म्हंटल तर वावग ठरणार नाही. याच कारण म्हणजे डेविड मिलर आणि राहुल तेवतिया यांचा चांगला फॉर्म. यंदाच्या हंगामात मिलर आणि तेवतियाने अनुक्रमे १३६ आणि १४८च्या स्ट्राईक रेटने ३८१ आमि २१७ रन्स बनवले आहेत. शिवाय अनेक सामन्यांत या दोघांची खेळी निर्णायक ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या आयपीएल हंगामात आम्ही सातत्याने…’, पंजाबच्या अपयशानंतर कर्णधार मयांकची प्रामाणिक कबुली
टीम बसमध्ये असताना अर्शदीपला मिळाली भारतीय संघातील निवडीची बातमी, खुद्द केला खुलासा
Video: थोडक्यात बचावला राजस्थान संघ! कोलकाताला जाताना विमान प्रवासादरम्यान टळले मोठे संकट