भारताचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी शेवटच्या षटकांमध्ये विशेषज्ञच्या रुपात टी नटराजनचे कौतुक केले आहे. भारतीय संघाला युएईमध्ये टी२० विश्वचषकादरम्यान डाव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाची कमी जाणावली असे त्यांनी म्हटले आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या भारताच्या कसोटी मालिका विजयात नटराजनने सर्वांना प्रभावित केले होते. गुडघ्याच्या दूखापतीमुळे मागील वर्षी तो अधिक काळ क्रिकेटपासून दूर होता. त्याने सोमवारी (५ एप्रिल) सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यातून शानदार पुनरागमन केले.
शास्त्रींनी क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी त्याच्यासाठी (नटराजन) खूप खुश आहे. आम्हाला विश्वचषकात त्याची कमी जाणवली. जर तो तंदुरुस्त असता तर त्याचे खेळणे निश्चित होते.” भारत २०२१ च्या विश्वचषकात साखळी फेरीतूनच बाहेर गेला होता.
शास्त्री म्हणाले, “तो इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान दूखापतग्रस्त झाला होता. तेव्हा त्याची कमी जाणवली. तो शेवटच्या षटकांमध्ये विशेषज्ञ गोलंदाज आहे आणि तो खुप कौशल्यांने याॅर्कर टाकतो. त्याच्याकडे शानदार नियंत्रण आहे. जेवढे तुम्ही विचार करता, तो त्याच्यापेक्षा अधिक वेगवान गतीने गोलंदाजी करतो.”
नटराजनला सनरायझर्स हैदराबादने ४ कोटींना खरेदी केले आहे. त्याने १२ महिन्यानंतर संघात पुनरागमन करत ४ षटकात २६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. परंतु संघाला १२ धावांनी पराभावाचा सामना करावा लागला. संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. ऑस्ट्रेलियाच्या २०२०-२१ च्या दौऱ्यावर असताना त्याने तिन्ही क्षेत्रांमध्ये महत्त्वाची कामगिरी केली. त्याने भारतासाठी पदार्पण केले, तेव्हा रवि शास्त्री संघाचे प्रशिक्षक होते.
शास्त्री म्हणाले, “नटराजन हैदराबाद संघासाठी भाग्यशाली ठरु शकतो. आम्ही त्याला ज्या-ज्या सामन्यासाठी निवडले, तेव्हा त्याने विजय मिळवून दिला आहे. त्याच्या टी२० मधील पदार्पणाच्या सामन्यात सुद्धा आम्ही जिंकलो होतो. त्याच्या कसोटी पदार्पणात देखील आम्ही जिंकलो होतो.” सनरायझर्स हैदराबाद आपला पुढील सामना सीएसकेविरुद्ध ९ एप्रिलला खेळणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भुवनेश्वरच्या प्रयत्नांचे व्हायला पाहिजे कौतुक! बाउंड्री लाईनवर असे करत आणली ‘मिस्टर ३६०’ची आठवण
आवेशने विकेट्सचा चौकार ‘तिला’ केला समर्पित; म्हणाला, ‘ती हॉस्पिटलमधूनही मला प्रेरणा देत होती’