---Advertisement---

IND VS ENG: भारताविरुद्धचा चौथा टी20 सामना इंग्लंडने या तीन कारणांमुळे गमावला

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध राजकोटमध्ये खेळला गेलेला तिसरा सामना जिंकल्यानंतर, इंग्लंडचा संघ चौथ्या सामन्यात दृढ हेतूने मैदानात उतरला. पुण्यात इंग्लंडने टीम इंडियाला आव्हान देण्याची ताकद दाखवली पण शेवटी इंग्लिश संघाला भारताकडून 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पुण्यात झालेल्या या सामन्यातील पराभवासह, इंग्लंडने 5 सामन्यांची टी20 मालिकाही गमावली आहे.

तिसरा टी20 सामना जिंकल्यानंतर, चौथ्या सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंड क्रिकेट संघ चांगल्या स्थितीत दिसत होता. त्याने टीम इंडियावर दबाव आणला. पण शेवटी त्यांनी सामन्यात काही चुका केल्या आणि पुणे टी20 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर मग पुण्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागण्याची 3 प्रमुख कारणांबद्दल जाणून घेऊया.

3. 5 विकेट पडल्यानंतर टीम इंडियाची पकड ढिली झाली.

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड संघाने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या डावात खेळताना भारताने फक्त 79 धावांवर 5 विकेट्स गमावले. यानंतर इंग्लिश संघ वर्चस्व गाजवत असल्याचे दिसून आले. पण त्यानंतर इंग्लंडची टीम इंडियावरील बांधलेली पकड सुटली. कारण हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी सहाव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करत सामना इंग्लंडकडून हिसकावून घेतला.

2. जोफ्रा आर्चरची खराब गोलंदाजी

भारताविरुद्धच्या या टी20 मालिकेत इंग्लंड संघाने आपला स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात निवडले. तो या मालिकेत विशेष प्रभाव पाडू शकेल असे मानले जात होते. पण आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीत विशेष काही दिसून आलेले नाही. चौथ्या टी20 सामन्यातही जोफ्राने खूप निराशा केली. त्याने 4 षटकांत 37 धावा दिल्या. शिवाय त्याला विकेटही मिळाली नाही. आर्चरचा हा खराब फॉर्म इंग्लंडच्या पराभवाचे कारण बनला.

1. चांगल्या सुरुवातीनंतर 5 धावांच्या आत 3 विकेट गमावल्या

इंग्लंडला टीम इंडियाकडून 182 धावांचे लक्ष्य मिळाले होते. यानंतर, इंग्लिश संघाचे सलामीवीर फिल साल्ट आणि बेन डकेट यांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी सहा षटकापर्यंत 62 धावा जोडल्या. या सामन्यात इंग्लंडला चांगला पाया मिळाला होता. पण फिरकी गोलंदाज येताच, जोस बटलरचा संघ अचानक डगमगला. संघाने 5 धावांच्या आत 3 विकेट गमावल्या. ज्यामध्ये फिल साल्ट, बेन डकेट आणि फॉर्ममध्ये असलेला कर्णधार जोस बटलर यांच्या विकेटचा समावेश होता. अशा परिस्थितीत झटपट विकेट गमावल्याने इंग्लंड संघ परत सामन्यात पुनरागमन करु शकला नाही.

हेही वाचा-

‘लाईक फाॅर लाईक रिप्लेसमेंट…’, टीम इंडियाच्या या निर्णयावर जोस बटलरची बोचरी टीका
हार्दिक पांड्या टीम इंडियाचा नवा फिनिशर..! याबाबतीत माजी कर्णधार धोनी-विराटला टाकले मागे
“हा निर्णय हेड कोच…”, वादग्रस्त ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ नियमावर हर्षित राणाची मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---