भारत आणि श्रीलंका (Ind vd SL T20 Series) यांच्यातील दुसरा टी-२० सामना शनिवारी (२६ फेब्रुवारी) धरमशाला स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने या सामन्यात खूपच अप्रतिम प्रदर्शन केले आणि संघाला मिळालेल्या विजयात त्याचे योगदान महत्वाचे राहिले. या कामगिरीसाठी श्रेयसला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सामना संपल्यानंतर त्याने सामन्यादरम्यान वापरलेली रणनिती आणि खेळपट्टीविषयी महत्वाचा खुलासा केला आहे.
सामन्यात भारतीय सलामीवीर जोडी स्वस्तात बाद झाली आणि नंतर श्रेयसने डाव सावरला. त्याने ४४ चेंडूत सर्वाधिक ७४ धावा केल्या आणि सामनावीर बनला. सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर तो म्हणाला की, “जेव्हा मी असे करतो, तेव्हा शरीरातील सतर्कता चांगल्या प्रकारे काम करते आणि हालचार होते.” ज्या चेंडूवर श्रेयस विकेट गमावता गमावता राहिला, त्याविषयी बोलताना तो म्हणाला की, “मी मागे सरकलो होतो आणि त्याने चेंडू चांगल्या प्रकारे फेकला होता. स्विंग चेंडूला स्टंपपासून लांब घेऊन गेला. जेव्हा मी स्वतः रिप्ले पाहिला, तेव्हा मी हैराण होतो. माझ्यासाठी चेंडूला वेळ देणे महत्वाचे होते, तो स्विंग आणि सिम करत होता. ईशान किशनने चांगली सुरुवात केली, पण तो जेव्हा बाद झाला तेव्हा संजू सॅमसनने आम्हाला पुढे नेले. त्यानंतर जडेजा फिनिश करण्यासाठी आला.”
लहिरू कुमारला अजून एखादे षटक दिले पाहिजे होते का? या प्रश्नावर उत्तर देताना श्रेयस म्हणाला की, “मी याविषयी विचार करत नव्हतो. स्वतःवर आणि वर्तमान स्थितीवर लक्ष केंद्रित केले होते, याविषयी आम्ही संघाच्या बैठकीत नेहमी चर्चा करतो. जेव्हा मी पहिल्या काही चेंडूंचा सामना केला, तेव्हा मला जाणीव झाली की, ही फिरकी गोलंदाजी टर्न करत नाहीये. त्यामुळे मला माहिती होते की, मी पायांचा वापर करू शकतो. चेंडू चांगल्याप्रकारे येत करत होता, त्यामुळे मी मोठ्या शॉटसाठी बाहेर येऊ शकत होतो.”
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने पाच विकेट्सच्या नुकसानावर १८३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य ३ विकेट्सच्या नुकसानावार गाठले आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. संजू सॅमसन (३९) आणि रवींद्र जडेजा (४५) यांनी श्रेयसची चांगली साथ दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्यापूर्वी ब्रॉडकास्टर्स खुश, तब्बल ‘एवढ्या’ लाख लोकांनी पाहिला मेगा लिलाव
टीम इंडियाला धक्का! फॉर्ममध्ये असलेला फलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२०तून बाहेर
हरमनप्रीतच्या झुंजार शतकी खेळीमुळे रोमांचक सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर २ धावांनी विजय