भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात खेळला गेलेला पहिला सराव सामना अनिर्णीत राहिला. दोन्ही संघामध्ये 17 डिसेंबर पासून सुरू होणार्या कसोटी सामन्यापूर्वी अजून एक सराव सामना होणे बाकी आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचा शतकवीर अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीन म्हणाला की, “भारतीय गोलंदाजांना खेळणे म्हणजे एक मोठ्या आव्हाना सारखे आहे.”
जागतिक दर्जाच्या गोलंदाजीमुळे आल्या अडचणी
कॅमरुन ग्रीन म्हणाला, “तुम्ही शील्ड क्रिकेट खेळत असताना गोलंदाजाचा अंदाज येत जातो. ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत क्रिकेट तुम्हाला चांगले तयार करतात. हे अधिक कठीण प्रतिस्पर्धा आहे, ज्यामधे विश्वस्तरीय खेळाडू आहेत. भारता विरुद्धचा सामना त्यापेक्षा ही अधिक आव्हानात्मक होता. कारण मी या पूर्वी या गोलंदाजांना गोलंदाजी करताना पाहिले नाही. मला खेळपट्टीवर स्थिर होण्यासाठी वेळ लागला.”
कॅमरुन म्हणाला, “भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवला खेळणे सर्वात अवघड होते, तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. खेळपट्टी कडून त्याला मदत मिळत नव्हती परंतु त्याने तीन बळी टिपले. हे खुप अवघड होते. माझ्यासोबत दुसर्या बाजूला टीम पेन होता, त्याची मला खुप मदत मिळाली. उमेशला खेळणे खरंच खुप कठीण होते.
ग्रीन आणि पेन यांनी सहाव्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. ग्रीन म्हणाला,”ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळवणे अवघड काम आहे. हा खुप संतुलित संघ आहे. डेविड वॉर्नर दुखापतीमुळे बाहेर आहे, परंतु माझा दावा त्या जागेसाठी नाही. माझं काम स्वतःला तयार करणे आहे.”
गुलाबी चेंडूवर खेळल्या जाणार्या दुसर्या सराव सामन्याबद्दल ग्रीन म्हणाला, “मी पहिले कधी गुलाबी चेंडूचा सामना केला नाही. सराव सामन्यात पहिल्यांदा खेळताना रोचक राहिले. मी त्या खेळाडूकडून सल्ला घेऊन खेळेन, जे या चेंडूवर खेळले आहेत.”
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ येत्या १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेत एकमेकांशी दोन हात करतील. ४ सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना अॅडलेडच्या मैदानावर खेळविण्यात येईल. हा सामना दिवस-रात्र स्वरूपाचा खेळविण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या:
– ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यातून विराट होऊ शकतो बाहेर, स्वत:च दिले संकेत
– भारत अ संघ पराभवापासून थोडक्यात बचावला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिला सराव सामना अनिर्णीत
– खेळाडू भारताच्या कसोटी संघात असायलाच हवा, माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नचे मत