---Advertisement---

८ षटकांच्या सामन्यात झाले तब्बल ९ विक्रम

On: मंगळवार, नोव्हेंबर 7, 2017 11:43 PM
---Advertisement---

तिरुअनंतपुरम। भारत विरुद्ध न्यूझीलँड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना भारताने ६ धावांनी जिंकत टी२० मालिका २-१ अशी जिंकली. केवळ ८ षटकांचा सामना असूनही या सामन्यात अनेक विक्रम झाले. ते असे- 

– ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत धावांचा पाठलाग करणारा संघ सर्व सामने पराभूत झालेली केवळ दुसरी मालिका. यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड २०१२

-विराट कोहलीने खेळाडू म्हणून भारताकडून १८६ वा सामना जिंकत हरभजन सिंग(१८५) आणि सौरव गांगुली(१८४)चा विक्रम मोडला. सचिन(३०७), धोनी(२५६), युवराज(२२७) आणि द्रविड(२१६) यादीत अव्वल. 

-सर्वात कमी धावा करूनही संघाने जिंकायची तिसरी वेळ. यापूर्वी आयर्लंड-बर्मुडा (४६धावा) आणि नेदरलँड-आयर्लंड(६०) हे कमी धावसंख्येचे सामने झाले. 

-भारताच्या ६ फलंदाजांनी कमीतकमी ६ चेंडू खेळले परंतु एकालाही ११ पेक्षा जास्त चेंडू खेळता आले नाही. 

-धोनीच्या संपूर्ण कारकिर्दीत तो पहिल्यांदाच एकही चेंडू न खेळता एकही धाव न करता नाबाद राहिला. 

-भारतातील हे ५०वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान होते. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड देश असून त्या देशात २३ मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. 

-न्यूझीलँड संघाचा हा १००वा आंतरराष्ट्रीय सामना होता. यापूर्वी केवळ पाकिस्तान (१२०) आणि दक्षिण आफ्रिका (१००) हे संघ १०० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. 

-कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत कोणतीही द्विपक्षीय मालिका पराभूत झाला नाही. (कमीतकमी २ सामने असलेली मालिका )

-माजी कर्णधार एमएस धोनीचा हा ८३वा सामना होता. यापूर्वी केवळ शाहिद आफ्रिदी (९८) आणि शोएब मलिक (९२) हे धोनीपेक्षा जास्त सामने खेळले आहेत. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment