ज्याप्रमाणे ऑलिम्पिकचा इतिहास खूप जुना आहे, त्याचप्रमाणे ऑलिम्पिकमधील भारताचा इतिहासही खूप जुना आहे. पहिलं आधुनिक ऑलिम्पिक 1896 मध्ये ग्रीसची राजधानी अथेन्स येथे आयोजित करण्यात आलं होतं. मात्र त्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं सहभाग घेतला नव्हता. तेव्हापासून आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारतानं एकूण 35 पदकं जिंकली आहेत. भारतासाठी आतापर्यंतचं सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरलं ते टोकियो 2020. या ऑलिम्पिकमध्ये भारतानं एकूण 7 पदकं जिंकली होती.
भारताच्या ऑलिम्पिक इतिहासाची सुरुवात 1900 पॅरिस गेम्सपासून होते. या ऑलिम्पिकमध्ये भारताकडून नॉर्मन प्रिचर्ड यांनी भाग घेतला होता. प्रिचर्ड हे मूळचे ब्रिटीश होते, परंतु त्यांचा जन्म 23 जून 1875 रोजी कलकत्ता येथे ब्रिटिश भारताच्या बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये झाला होता. नॉर्मन प्रिचार्ड यांनी पॅरिस ऑलिम्पिक 1900 मध्ये 200 मीटर अडथळा शर्यतीत भाग घेतला होता. भारतानं 1920 मध्ये अँटवर्प ऑलिम्पिकसाठी आपला पहिला अधिकृत संघ पाठवला. त्यावेळी केवळ 5 खेळाडूंनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
1900 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं पहिलं पदक जिंकलं. नॉर्मन प्रिचर्ड यांनी 200 मीटर शर्यत आणि 200 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक जिंकलं होतं. मात्र अधिकृतपणे भारताला पहिलं पदक 1928 ॲमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये जिंकण्यात यश आलं. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं सुवर्ण पदक जिंकलं होतं. या संघाचं नेतृत्व महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद करत होते. विशेष म्हणजे, या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघानं एकही गोल खाल्ला नव्हता. यानंतर 1932 आणि 1936 ऑलिम्पिकमध्येही भारतीय हॉकी संघानं सुवर्णपदक जिंकलं.
पॅरिस ऑलिम्पिक 1900 पासून टोकियो ऑलिम्पिक 2020 पर्यंत भारतानं आतापर्यंत 25 उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. तेव्हापासून एकूण 1,218 भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला. टोकियो ऑलिम्पिक 2020 पर्यंत भारतानं 35 पदकं जिंकली आहेत, ज्यामध्ये 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नाईलाजास्तव खेळायला सुरुवात केली…आज बनला जगातील सर्वात प्रसिद्ध भालाफेकपटू! मजेदार आहे नीरज चोप्राची कहानी
ऑलिम्पिकमध्ये दिल्या जाणाऱ्या सुवर्ण पदकामध्ये खरोखरच सोनं असतं का? जाणून घ्या कोणत्या धातूपासून बनलं जातं मेडल
ऑलिम्पिकमध्ये फक्त 5 रिंग का असतात? रिंगच्या रंगांचा अर्थ काय? सर्वकाही जाणून घ्या