---Advertisement---

‘विराट- शास्त्रींनी कट रचत रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून केले बाहेर?’ चाहत्यांचे गंभीर आरोप

On: मंगळवार, ऑक्टोबर 27, 2020 11:07 PM
---Advertisement---

बीसीसीआयने सोमवारी (२६ ऑक्टोबर) येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी, वनडे आणि टी२० संघाची घोषणा केली होती. परंतु विशेष म्हणजे यातील कोणत्याही क्रिकेट प्रकारातील संघात सलामीवीर रोहित शर्माला स्थान दिले नाही.

बीसीसीआयने सांगितले अनफीट

बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते की, रोहित शर्मा दुखापतग्रस्त आहे. त्याची दुखापत पाहता, त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान संघाचा बाग बनवता येऊ शकते.

मुंबईने म्हटले रोहित खेळू शकतो

आयपीएलमध्ये रोहित शर्मा आपल्या दुखापतींमुळे मागील दोन सामन्यांत मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला नव्हता. तरीही फ्रँचायझी मुंबईकडून सांगण्यात आले की, येत्या आयपीएल सामन्यांमध्ये तो मैदानावर पुनरागमन करेल.

चाहत्यांमध्ये गोंधळ

रोहित शर्माच्या फीटनेसबाबत बीसीसीआय आणि मुंबई इंडियन्सकडून देण्यात आलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. जर रोहित फीट नाही, तर तो मुंबईकडून कसा खेळेल? सोबतच जर रोहितची दुखापतग्रस्त जास्त गंभीर नाही, तर त्याला पूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून बाहेर का केले आहे?, असे चाहत्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.

चाहत्यांनी विराट- शास्त्रींवर लावला गंभीर आरोप

ट्विटरवर हॅशटॅग हिटमॅन सध्या सर्वाधिक ट्रेंड होत आहे. रोहितच्या चाहत्यांनी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रींवर आरोप केले आहेत.

चाहत्यांनी म्हटले की, विराट कोहली आणि रवी शास्त्रींनी कट रचत रोहितला संघातून काढण्याचा प्लॅन केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---