आज टी 20 विश्वचषकातील सर्वाधिक चर्चेत असलेले सामना खेळवला जाणार आहे. कारण क्रिकेट विश्वात प्रतिस्पर्धी असलेल्या दोन संघाचा आज (24 जून) सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्टेलिया संघांचा हा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. टीम इंडिया हा सामना जिंकल्यास थेट सेमी फायनलसाठी पात्र ठरेल. याआधी शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 21 धावांनी दणदणीत विजय मिळवले होते. मात्र, भारतीय संघाला पराभूत करणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसेल. आकडेवारीनूसार टी20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दबदबा आहे.
आतापर्यंत टी20 विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 5 वेळा आमने सामने आले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने 3 सामन्यात विजय मिळवले आहे. तर कांगारुंनी 2 सामन्यात भारताला मात दिली आहे. टी20 विश्वचषकात या दोन्ही संघात शेवटचा सामना जवळपास 8 वर्षापूर्वी झाला होता. ज्यामध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. महेन्द्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 6 विकेट्सनी विजय मिळवले होते. याशिवाय एकूण आकडेवारीवरुन असे दिसून येते की, ऑस्ट्रेलियासाठी भारताला नमवणे नेहमीच कठीण गेले आहे. भारतीय संघाने टी20 फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियावर आपला दबदबा कायम ठेवला आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये एकूण 31 सामने खेळले आहेत. ज्यमाध्ये इंडियाने कांगारुंना 19 वेळा हरवले आहे. तर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मगील 5 टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 4 वेळा नमवले आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्तवाखाली भारतीय संघ शानदार कामगिरी केली आहे. स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि इंगलंड हे दोन संघ गट2 मधून सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? संजू सॅमसनला संघात स्थान मिळेल का?
बाबर आझमची नाचक्की! पाकिस्तानच्या संसदेत झाला ट्रोल, खासदारानं घेतली खूप मजा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट, मॅच रद्द झाल्यास कोणाचा फायदा? सेमीफायनलचं समीकरण समजून घ्या