टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना काही तासांत सुरू होणार आहे. या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडतील. हा सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे, जिथे सुपर 8 सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा पराभव केला होता. या अंतिम सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल, असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात असतील. या प्रश्नांचे उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देणार आहोत.
2023 एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं खेळपट्टीबाबत मोठी चूक केली होती, ज्याचे परिणाम संघाला भोगावे लागले. यामुळे आता टीम इंडियाला खेळपट्टीबाबत कोणतीही चूक करणं परवडणारं नाही. सामन्याच्या एक दिवस आधी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी खेळपट्टीची पाहणी केली.
जर आपण खेळपट्टीच्या अहवालाबद्दल बोललो तर, ही खेळपट्टी भारत-अफगाणिस्तान सामन्यासारखी नाही. येथे फिरकीपटूंना मदत मिळेल. स्पिनर्सचा चेंडू इथे थोडा अडकतो, थोडा फिरतो आणि त्याला उसळीही मिळते. त्यामुळे या सामन्यात फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मात्र, जर ढगाळ स्थिती असेल, तर वेगवान सुरुवातीला गोलंदाजांनाही मदत मिळू शकते.
आता नाणेफेक जिंकल्यानंतर काय करणं योग्य आहे याबद्दल बोलूया. टीम इंडियाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकली तर त्यानं प्रथम फलंदाजी करावी. याचं कारण अंतिम सामन्यात स्कोअरबोर्डचा दबाव खूप जास्त असतो. टीम इंडियाची फलंदाजी खूप मजबूत आहे आणि जर संघानं प्रथम फलंदाजी करताना 170 पेक्षा जास्त धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेवर खूप दबाव असेल. विशेष म्हणजे, या विश्वचषकात भारतानं नाणेफेक जिंकल्यानंतर बहुतांश वेळी प्रथम फलंदाजी केली आहे.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी त्यांची कमजोरी आहे. त्यांच्याकडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत, पण त्यांची फलंदाजी तेवढी मजबूत नाही. याशिवाय ते पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या कारणामुळे धावांचा पाठलाग करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला तर संघ हा दबाव झेलू शकणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
IND vs RSA सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला तर ट्राॅफी कुणाची?
आता वर्ल्डकप आपलाच…!!! ‘पनौती’ म्हणून ओळख असलेल्या सेलिब्रेटीचा दक्षिण आफ्रिकेला सपोर्ट
…तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची फायनल ठरू शकते विराट कोहलीच्या टी20 करिअरची अखेरची मॅच!