ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे. एक प्रकारे, मायकेल क्लार्क त्याच्या जुन्या भाकितावर ठाम आहे, ज्यामध्ये त्याने दावा केला होता की टीम इंडिया 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करेल. आता त्याने बाद फेरीपूर्वी तीच गोष्ट पुन्हा सांगितली आहे. तथापि, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य सामना होण्याची शक्यता आहे. जर टीम इंडियाने शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला हरवले तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सेमीफायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल. अशा परिस्थितीत, अंतिम सामना पुन्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार नाही.
क्लार्कच्या मते, भारत सध्या जगातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ आहे. “मला वाटतं ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचेल आणि भारताविरुद्ध खेळेल. मला वाटतं ऑस्ट्रेलिया जिंकावं, पण मला असंही वाटतं की भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल.सध्या ते जगातील सर्वोत्तम आणि नंबर 1 वनडे संघ आहेत. मला वाटतं अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल आणि भारत एका धावेने जिंकेल,” असं क्लार्कने रेव्हस्पोर्ट्झला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
तो पुढे म्हणाला, “तो (रोहित शर्मा) पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे, यात काही शंका नाही. चॅम्पियन्स ट्राॅफी 2025 पूर्वी कटकमध्ये त्याने शतक केले. तो चेंडू खूप चांगला खेळत आहे. स्पर्धेत त्याची भूमिका महत्त्वाची आहे.”
हेही वाचा-
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! रिझवान बाद, बाबर-शाहीनही बाहेर; हा नवा स्टार बनेल कर्णधार?
IND vs NZ: किवी संघाने जिंकला टाॅस, टीम इंडियात मोठा बदल, पाहा प्लेइंग 11
“जाता-जाता आणखी एक…”, अनुभवी खेळाडूची विराट-रोहितला विशेष मागणी!