भारतीय संघ (Team india) इंग्लंड दौऱ्यावर आहे. 20 जून पासून शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वात टीम इंडिया आणि इंग्लंड (IND vs ENG) संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी या मालिकेआधी टीम इंडियाचे गौतम गंभीर (team india head Coach Gautam Gambhir) भारतात परत आले आहे. गौतम गंभीर यांच्या आईला हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना परत यावे लागले. दुसरीकडे ते परत कधी इंग्लंडला जातील त्याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
तसेच एका रिपोर्ट नुसार ही माहिती मिळत आहे की, दुसरे भारतीय प्रशिक्षक इंग्लंडला गेले आहेत आणि टीम इंडियाच्या सरावावावर लक्ष ठेवत आहेत.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या आई आयसीयूमध्ये असल्याकारणाने ते सध्या भारतात आलेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आणि इंडिया ए इंट्रा स्क्वाड सामने खेळत आहे. तसेच रेवस्पोर्ट्जच्या एका रिपोर्टनुसार बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सेलन्सचे सीईओ आणि माजी भारतीय दिगज वी वी एस लक्ष्मण (S Laxman) काही वेळा पर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतात. रिपोर्टनुसार ते आधीच लंडनमध्ये आहेत आणि टीम इंडियावर लक्ष ठेवत आहेत. त्यांच्याशिवाय मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Aagarkar) हे देखील टीम इंडियाच्या सरावावर लक्ष ठेवून आहेत.
याआधी देखील लक्ष्मण यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे. जेव्हा जेव्हा प्रशिक्षक राहून द्रविड (rahul Dravid) टीम इंडिया सोबत नसायचे तेव्हा तेव्हा काही मालिकेत टीम इंडियाचे प्रशिक्षण व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीच केले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना ही जबाबदारी पार पाडताना पाहायला मिळू शकते.