बीसीसीआयने मागील एक वर्षापासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना यो-यो टेस्ट सक्तीची केली आहे. त्यामुळे यो-यो टेस्ट हा भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
अनेकांनी यो-यो टेस्टच्या अंबलबजावणीला पाठिंबा दिला आहे, तर अनेकांनी यावर उघड नाराजी व्यक्त केली आहे. आता यावर भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खाननेही आपली मते मांडली आहेत.
तो म्हणाला, “मला जेवढे माहित आहे त्यापैकी सध्या भारताच्या यो-यो टेस्टच्या गुणांची पातळी जागतीक तुलनेत कमी आहे. जर एखादा खेळाडू त्या पातळीपर्यंत पोहचू शकत नसेल तर मला वाटते तिथे काहीतरी समस्या आहे.”
“एकसारखेपणाने जर ही गुणांची पातळी लागू होत असेल तर ती माझ्यासाठी ती योग्य आहे. जर सिनियर आणि ज्यूनियर खेळाडूंसाठी सारखे निकष लागू होणार असतील तर मला काहीच समस्या नाही. नक्कीच फोकस हा कौशल्यावर असला पाहिजे पण या भारतीय संघाला फिट रहाण्याचीही इच्छा आहे. विराट कोहली आणि संघव्यवस्थापक संघाच्या फायद्याच्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत.” असेही झहीर पुढे म्हणाला.
भारताच्या यो-यो टेस्टच्या गुणांची पातळी ही 16.1 एवढी आहे. जर खेळाडूंनी ही पातळी गाठली तरच ते या फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण झाल्याचे समजले जाते.
याआधी भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि सचिन तेंडुलकरने यो-यो टेस्ट हा संघनिवडीसाठी एकमेव निकष असू शकत नाही असे मत मांडले होते. तर भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी यो-यो टेस्टला पाठिंबा दिला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–माझ्या वेतनाबद्दल काय? रोहितची पत्नी रितीकाचा प्रश्न
–टाॅप ५- इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे ५ भारतीय गोलंदाज
-वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अॅंडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी