वनडे सामन्यात असे अनेक प्रसंग घडले आहेत, जेव्हा एखाद्या खेळाडूने एकाच सामन्यात सलामीला फलंदाजी तसेच सलामीची गोलंदाजीही (डावातील पहिल्या २ षटकांपैकी एक षटकात गोलंदाजी) केली. हा विक्रम प्रथम आफ्रिकेच्या विरासत अलीने १९७५ मध्ये न्यूझीलंडविरूद्ध केला होता. वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४४ खेळाडूंनी हा अनोखा विक्रम नोंदविला आहे. भारताच्या मनोज प्रभाकरने सर्वाधिक ४५ वेळा हा विक्रम केला आहे.
आतापर्यंत भारताच्या सर्वाधिक ५ खेळाडूंनी एकाच सामन्यात सलामीची फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याचा विक्रम नोंदविला आहे. पहिला विक्रम १९८० मध्ये रॉजर बिन्नी यांनी केला. भारत व्यतिरिक्त पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सकडून प्रत्येकी चार, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका आणि स्कॉटलंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, युएई आणि पापुआ न्यू गिनी यांच्या नावे प्रत्येकी दोन खेळाडूंनी हा विक्रम आहेत. पूर्व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, कॅनडा, बर्म्युडा, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगमधील एक-एक खेळाडूने हा विक्रम केला आहे.
एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे भारतीय खेळाडू…
१. रॉजर बिन्नी
वनडेमधील दोन सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजीचा विक्रम रॉजर बिन्नी यांच्या नावावर आहे. डिसेंबर १९८० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी वनडेमध्ये त्यांनी हा पहिल्यांदा विक्रम केला. त्यांनी त्या सामन्यात सलामीला फलंदाजी करत ३१ धावा केल्या आणि सामन्यातील पाहिलं सलामीचा षटकही टाकलं
त्यानंतर जानेवारी १९८१ मध्ये बिन्नीने मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसर्यांदा हा विक्रम केला. त्या सामन्यात त्यांनी २१ धावा केल्या आणि पाहिलं षटकात गोलंदाजीही केली. या दोन सामन्यांनंतर त्यांना कधी वनडेत सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
२. मनोज प्रभाकर
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू मनोज प्रभाकर यांनी एकाच सामन्यात सलामीची फलंदाजी व गोलंदाजीचा विक्रम ४५ वेळा नोंदविला आहे. हा देखील एक विक्रम आहे. मार्च १९८७ मध्ये जमशेदपूर येथे पाकिस्तानविरुद्ध त्यांनी प्रथम हा विक्रम केला. त्या सामन्यात पाकिस्तानने भारताला ५ गडी राखून पराभूत केले, पण मनोज प्रभाकर सलामीला फलंदाजी करत १०६ धावांची खेळी केली होती. या शानदार शतकी खेळीसाठी त्यांना सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते. ह्या त्यांचा वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा होत्या. या सामन्यात त्यांनी सलामीच षटकही टाकलं. परंतु या सामन्यात त्यांना गोलंदाजीत काहीच यश मिळाले नाही.
या व्यतिरिक्त मनोज प्रभाकर यांनी आपल्या कारकीर्दीत आणखी एक शतक ठोकले. ऑक्टोबर १९९४ मध्ये कानपूर येथे वेस्ट इंडिजविरुद्ध मनोज प्रभाकरने नाबाद १०२ धावा केल्या आणि या सामन्यातही त्याने सलामीच्या गोलंदाजीनंतर सलामीला फलंदाजी केली होती.
३. कपिल देव
भारतीय संघाचा महान अष्टपैलू खेळाडू कपिल देवनेही एकदा हा अनोखा विक्रम नोंदविला आहे. १९९२ च्या विश्वचषकात हॅमिल्टनमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात कपिल देवने सलामीची फलंदाजी करताना १० धावा फटकावल्या परंतु गोलंदाजीत त्याला यश मिळाले नाही.
४. वीरेंद्र सेहवाग
भारतीय संघातील माजी महान सलामीवीर वीरेंद्र सेहवागने नोव्हेंबर २००३ मध्ये मुंबई वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा विक्रम केला होता. मात्र, तो सामना सेहवागसाठी संस्मरणीय नव्हता. त्याला गोलंदाजीत यश आले नाही आणि फलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता तो बाद झाला.
५. इरफान पठाण
भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू इरफान पठाणनेही २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कोलकाता येथील वनडे सामन्यात हा विक्रम केला होता. हा सामना पठाणसाठी संस्मरणीय नव्हता आणि त्याला सलामीला फलंदाजीत खातेही उघडता आले नाही आणि त्याला गोलंदाजीत कोणतेही यश मिळू शकले नाही.
ट्रेंडिंग लेख –
अशा ६ घटना जेव्हा नाईटवॉचमन म्हणून खेळायला आलेल्या क्रिकेटपटूने केले शतक
आयपीएल २०२० दरम्यान या ३ भारतीय वेगवान गोलंदाजांवर असेल निवड समीतीचे लक्ष
क्रिकेटवेड्या देशाला फुटबॉलची भुरळ पाडणारा सुनील छेत्री
महत्त्वाच्या बातम्या –
‘धोनीपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही’ इंग्लंडच्या खेळाडूने केली धोनीची प्रशंसा…
रैनाने म्हटले रोहितच पुढचा धोनी, तर रोहितने दिले ‘हटके’ प्रत्युत्तर
लॉकडाऊनमध्ये कोणाबरोबर रहायला आवडेल?, ‘या’ खेळाडूने घेतले धोनीचे नाव…