भारतीय पुरुष संघाप्रमाणेच भारतीय महिला क्रिकेट संघ देखील सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय महिला संघाचा एकमेव कसोटी सामना बुधवारपासून (१६ जून) ब्रिस्टल येथे सुरू होणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वातील हा संघ तब्बल सात वर्षानंतर आंतराष्ट्रीय कसोटी सामना खेळेल. यानंतर, दोन्ही संघ वनडे व टी२० मालिका खेळतील.विशेष म्हणजे भारतीय महिला संघाला आतापर्यंत इंग्लंडमध्ये एका ही कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नाही.
कसोटी क्रिकेटसाठी भारतीय संघ नवीन
एकमेव कसोटीसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघातील सात खेळाडूंना कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. त्यापैकी, कर्णधार मिताली राज व अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी यांनी प्रत्येकी १० कसोटी सामने खेळले आहेत. तर, बाकी खेळाडूंनी केवळ दोन किंवा एकाच कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताने आपला अखेरचा कसोटी सामना मायदेशात २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. यामध्ये भारतीय संघाला विजय मिळालेला.
अशी असेल गुणांकन पद्धत
भारतीय संघ या दौऱ्यावर वेगळ्या पद्धतीने विजेता ठरू शकतो. एकमेव कसोटीत विजय मिळवल्यास संघाला ४ चार तर, सामना अनिर्णित राहिल्यास प्रत्येक संघाला दोन गुण देण्यात येते. वनडे व टी२० सामन्यात विजय संघाला दोन गुण देण्यात येणार आहेत. दौर्याच्या अखेरीस सर्वाधिक गुण मिळवणारा संघ विजेता ठरेल. १६ जून ते २० जून या काळात कसोटी सामना संपल्यानंतर, २७ जून ते १५ जुलै या कालावधीत वनडे व टी२० मालिका खेळवली जाईल.
एकमेव कसोटीसाठी भारतीय महिला संघ:
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, एकता बिश्त, स्मृती मंधना, शेफाली वर्मा, शिखा पांडे, पूनम यादव, प्रिया पुनिया, स्नेह राणा, पूनम राऊत, अरूंधती रेड्डी, जेमिमा रॉड्रिग्ज, इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक), दिप्ती शर्मा, राधा यादव व पुजा वस्त्रकार.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा, विराट कर्णधार तर…
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू, दोन आहेत भारताचे लोकप्रिय फलंदाज
विश्वनाथन आनंदला हरवणारा अब्जाधीश निघाला बेईमान, संगणकाची मदत घेऊन खेळलेला सामना