रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनेच्या संघाने या आयपीएल हंगामाची चमकदार सुरुवात केली. त्याने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसारख्या संघाचा पराभव केला. पण त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून त्यांना ९७ धावांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर, संघाने त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकले. पण नंतर त्यांना दिल्ली कॅपिटल्सने ५९ धावांनी पुन्हा पराभवाची धूळ चारली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएलच्या या हंगामात गमावलेल्या २ सामन्यांमधील पराभवाचा फरक खूप मोठा आहे. त्यामुळे जरी संघाने सुरुवात ३ सामने जिंकून चांगली केली असली तरी पुढे नेट रनरेटची समस्या उद्भवली तर त्यांना मागे पडावे लागू शकते.
आरसीबीचा संघ अद्याप त्यांचे योग्य संघ नियोजन करू शकला नाही. त्यामुळे या लेखात त्यांच्या संघातील ३ खेळाडूंचा आढावा घेतला आहे, ज्यांना आरसीबीने त्यांच्या अंतिम अकरामध्ये स्थान देणे आवश्यक आहे. चला ते तीन खेळाडू कोण आहेत ते जाणून घेऊया.
३. पवन नेगी
पवन नेगी हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो एक उत्तम क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने मैदानावर अनेक उत्तम झेल पकडले आहेत. पवन नेगीची फलंदाजीतही उत्तम कामगिरी आहे. लोअर ऑर्डरमध्ये येऊन तो जबरदस्त खेळी करू शकतो. तसेच गरज भासल्यास फिरकी गोलंदाजी करू शकतो.
कर्णधार विराट कोहली यावेळी शिवम दुबेकडून गोलंदाजी करून घेत नाही आणि काही सामन्यांमध्ये त्याची फलंदाजीही चांगली झालेली नाही. याच कारणास्तव पवन नेगीला अंतिम आकारामध्ये संधी दिली जाऊ शकते. नेगी जर फॉर्मात आला तर तो आरसीबीला अनेक सामने जिंकून देऊ शकतो. खालच्या फळीत संघाला एका जबरदस्त फलंदाजाची आवश्यकता आहे.
२. ख्रिस मॉरिस
या हंगामाच्या लिलावात आरसीबीने ख्रिस मॉरिससाठी खूप महागडी बोली लावली होती पण त्याला या हंगामात आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. ख्रिस मॉरिस एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. चांगल्या गोलंदाजीबरोबरच फलंदाजी करण्यासही तो सक्षम आहे. मागील हंगामात त्याने ९ सामन्यात १३ बळी मिळवले होते म्हणूनच आरसीबीने त्याला संघाच्या अंतिम आकारामध्ये समाविष्ट केले पाहिजे.
३. उमेश यादव
उमेश यादव हा पहिल्या २ सामन्यांमध्ये खूपच महागडा ठरला असेल पण तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्याकडे सामना खेचून आणण्याची क्षमता आहे. जर त्याला सातत्यपूर्ण संधी मिळाली आणि गोलंदाजी प्रशिक्षक त्याच्याबरोबर काम करत असेल तर नक्कीच तो संघासाठी सामना जिंकून देऊ शकतो.
गेल्या आयपीएल मोसमातही उमेश यादवने ११ सामन्यांमध्ये ८ बळी घेतले होते. या त्याला अंतिम आकारामध्ये पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे.