मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची ट्विटरवर चेष्टा केली जात आहे. इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम यंदा युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सर्व फ्रॅन्चायजी तयारीला लागल्या आहेत. अशा परिस्थितीत कोहलीने मंगळवारी आयपीएलची आठवण करून देणारी दोन छायाचित्रे शेअर केली असून त्यामध्ये तो आपल्या सहकाऱ्यांसमवेत आरसीबीच्या जर्सीमध्ये दिसला. परंतु फोटोतील त्याचा जोश पाहून लोक त्याची चेष्टा करायला लागले.
फोटो शेअर करताना कोहलीने दोन इमोटिकॉन वापरले आहेत ज्यामुळे समजून येते की तो आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहे. कोहलीने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यात एकामध्ये एबी डिव्हिलियर्स त्याच्यासोबत दिसला, तर दुसर्या फोटोमध्ये तो टीमसोबत आहे. त्यांनंतर लोक ट्विटरवर कोहलीचा क्लास घेऊ लागले. एका युजरने त्याला अयशस्वी कर्णधार म्हटले.
⏳???? pic.twitter.com/nGDI2tDq8p
— Virat Kohli (@imVkohli) August 4, 2020
राहुल ठाकूर या नावाच्या युजरने लिहिले की, “यावेळी तुमचा संघ अपमानीत होण्यापासून वाचला. आपण किती अपयशी कर्णधार आहात, हे आपल्या टीमच्या सततच्या पराभवामुळे सिद्ध होते. भारतीय संघातील आपले नेतृत्व चमकत आहे. कारण भारतीय क्रिकेट संघात तुमच्यापेक्षा खूप मोठा खेळाडू आहे.”
https://twitter.com/RahulTh85476593/status/1290680192017428480?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1290680192017428480%7Ctwgr%5E&ref_url=https%3A%2F%2Fhindi.mykhel.com%2Fcricket%2Fipl-2020-virat-kohli-trolled-on-twitter-after-shared-two-pictures-044754.html
Virat Kohli to trollers indirectly pic.twitter.com/UBmwvizNTD
— nikhil_raj (@humans_write) August 4, 2020
https://twitter.com/kafan_chorr/status/1290682776564330496?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1290682776564330496%7Ctwgr%5E&ref_url=https%3A%2F%2Fhindi.mykhel.com%2Fcricket%2Fipl-2020-virat-kohli-trolled-on-twitter-after-shared-two-pictures-044754.html
RCB fans to RCB after league stage : pic.twitter.com/N9d5C68TIA
— ɪʟʟᴜᴍɪɴᴀᴛɪ (@TweetKiller_) August 4, 2020
Virat- we'll win IPL Trophy.
Trophy- pic.twitter.com/pAevJgVneB
— AaYuu (@A_BrahminGirlll) August 4, 2020
???????????? pic.twitter.com/S6nkuLWaPJ
— Internet Explorer (@explorerhoon) August 4, 2020
आरसीबीला एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आले नाही. या कारणास्तव कोहलीवरही टीका केली जाते. त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याची मागणीही करण्यात आली होती. कोहली 2008 पासून आरसीबीकडून खेळत आहे. कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे जो 13 वर्षे याच फ्रँचायझीमध्ये खेळला आहे.