मुंबई । आयपीएलचा 13 वा हंगाम युएईमध्ये खेळविला जाणार आहे. याच दरम्यान फ्रेंचायजींना एक प्रश्न सतावत आहे तो म्हणजे ज्या दिवशी सामना होणार नाही त्या दिवशी खेळाडू काय करतील? कारण म्हणजे सद्यस्थितीत कोविड-19 साथीमुळे खेळाडू हॉटेलच्या बाहेर जाऊ शकणार नाहीत. त्याचबरोबर, बीसीसीआयने अद्याप संघांसह कुटुंबीयांना घेण्यास मान्यता दिली नाही.
याबाबत एका फ्रँचायझीच्या अधिकार्याने सांगितले की, “खेळाडूंना दोन महिने खोल्यांमध्ये रहायचे असेल तर तुम्हाला त्यांना पर्याय द्यावा लागेल. ज्या दिवशी सामना होणार नाही त्या दिवशी खेळाडूंसाठी हॉटेलच्या खोलीमधील वातावरण उत्साहित करणारे असावे, असे वातावरण आपल्याला तयार करावे लागेल.”
आणखी एका फ्रँचायझी अधिकार्याने सांगितले की, “खेळाडू आपल्या खोलीत राहून नेटफिलिक्सवर चित्रपट पाहू शकतील. खेळाडूंना व्यस्त ठेवण्यासाठी आपण वेगळा विचार केला पाहिजे. हे आमच्यासाठी नक्कीच एक आव्हान असेल, विशेषत: जेव्हा खेळाडूंची कुटुंबे एकत्र नसतात. आम्हाला याबाबतची माहिती येत्या काही दिवसांत बीसीसीआयकडून मिळेल.”
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेंचायझींनी बीसीसीआयकडे खेळाडूं व सहाय्यक कर्मचार्यांना आपले कुटुंब सोबत घेऊन जाण्याची परवानगी मागितली आहे. कुटुंबानी एकत्र न जाता टप्प्या टप्प्यांमध्ये यूएईमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन फ्रेंचायझींने केले आहे.
यूएईमधील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोविड-19 चा अहवाल निगेटिव्ह आला, तर कुटुंबांना क्वारंटाइनमध्ये ठेवणे आवश्यक नाही. त्यामुळे खेळाडूंच्या पत्नी किंवा मैत्रिणींना काही काळ तेथे जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती काही फ्रेंचायझींनी केली आहे. तसेच खेळाडूंनी देखील दोन महिने नव्हे तर दहा-पंधरा दिवस कुटुंब आपल्यासोबत ठेवण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीला अटक करण्याची मागणी, मद्रास हायकोर्टात याचिका दाखल
मयंक-रोहित नाही तर ही आहे सध्याची सर्वोत्तम सलामी जोडी, भारताच्या ह्या माजी क्रिकेटरचे मत
पाँटिंग आणि धोनी या दोघांत सर्वोत्तम कर्णधार कोण? आफ्रिदीने दिले ‘हे’ उत्तर
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही
आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी