इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022) हंगामाचे बिगूल वाजले असून २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. तत्पूर्वी आयपीएलमध्ये सहभागी सर्व फ्रँचायझी मुंबईमध्ये जमा होत आहेत. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिले ३ सामने मुंबईच्या ३ वेगवेगळ्या स्टेडियमवर रंगणार आहेत. मात्र यापूर्वीच मोठा विवाद निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये मंगळवारी (१५ मार्च) दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बसवर हल्ला झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या (मनसे, MNS) ५-६ कार्यकर्त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) च्या बसवर हल्ला केला (Delhi Capitals Bus Attack) आणि तोडफोड केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलिसांद्वारे मनसे कार्यकर्त्यांवर आईपीसीची धारा १४३, १४७, १४९ आणि ४२७ अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. सुखावह बाब म्हणजे, या हल्ल्यात कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही.
दिल्ली कॅपिटल्सच्या बसवर हल्ला
मुंबईतील ताज पॅलेस या पंचतारांकित हॉटेलबाहेर दिल्ली संघाची बस उभी होती. राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयपीएल खेळाडूंच्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या याच लग्जरी बसच्या खिडक्या तोडल्या आहेत. एमएनएस -वाहतुक सेनाच्या (ट्रान्सपोर्ट विंग) जवळपास अर्धा डजन कार्यकर्त्यांनी मध्यरात्री पहिल्या बसमध्ये घुसून, बसवर आपल्या मागण्यांचे पोस्टर लावले. नारेबाजी केली आणि मग बसच्या खिडक्या तोडल्या.
का केला गेला दिल्ली कॅपिटल्सच्या बसवर हल्ला?
दिल्ली कॅपिटल्सच्या बसवर हल्ला झाल्यानंतर एमएनएस-वाहतुक सेनेच्या एका कार्यकर्त्याने आयएएनसला कारण सांगताना म्हटले की, आयपीएल फ्रँचायझीकडून राज्याच्या बाहेरील बस किरायावर घेतल्या गेल्याने आम्ही विरोध दर्शवला होता. यामुळे स्थानिय लोक रोजगाराच्या संधीपासून वंचित राहात आहेत. आमच्या विरोधानंतरही त्यांनी दिल्ली आणि अन्य भागातील बसांना व इतर छोट्या वाहनांना वापरण्याची परवानगी दिली आहे. यामुळे स्थानिय लोकांची आजीविका प्रभावित होत आहे.
#क्रिकेट आणि #राजकारण यांचा तसा संबंध जुणाच
तसेच,#मनसे आणि #तोडफोड यांचाही संबंध जुणाच आहे!
पण कालच्या या तोडफोडीचा थोडा गांभीर्याने विचार करायला हवा.#mns #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #राजठाकरे #Raj #Thackeray #IPL #आयपीएल #TataIPL #Mumbai #मुंबई #म @mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/pP4pLaBRpN— Vishal Kumbhar विशाल कुंभार (@VishalKumbharMH) March 16, 2022
थोडक्यात सांगायचे झाल्यास, आयपीएल फ्रँचायझींनी बसचे कॉन्ट्रॅक्ट दिल्लीतील कंपनीला दिले आहेत. परंतु मनसे कार्यकर्त्यांची मागणी आहे की, बसचा कॉन्ट्रॅक्ट स्थानिक अर्थात महाराष्ट्रातील कंपन्यांना देण्यात यावा.
महत्त्वाच्या बातम्या-
‘एमएस धोनीपेक्षा सरस बनू शकतो रिषभ पंत’, माजी भारतीय सलामीवीराचा विश्वास
हार्दिकला मिळणार तेवतियाची साथ; अष्टपैलू म्हणतोय, ‘आता जबाबदारी घ्यावी लागेल’
इंग्लंडकडून भारताचा लाजिरवाणा पराभव, ४ विकेट्सने एकतर्फी सामना जिंकत उघडले विजयाचे खाते