---Advertisement---

“आम्ही १००% त्याच्यासोबत आहोत…”, सामन्यात ‘व्हिलन’ बनलेल्या गोलंदाजाला मयंक अगरवालचा भक्कम पाठिंबा

On: शनिवार, एप्रिल 9, 2022 2:13 PM
Mayank-Agarwal
---Advertisement---

शुक्रवारी (दि. ०८ एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात आयपीएल १५चा १६वा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेला हा सामना गुजरात संघाने ६ विकेट्सने जिंकला. यावेळी गुजरातच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या सामन्यात झालेल्या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल निराश झाला. त्याने आपली पहिली प्रतिक्रिया दिलीये.

या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने (Punjab Kings) लियाम लिविंगस्टोनच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १८९ धावा केल्या आणि गुजरातला १९० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान गुजरातने २० षटकात ४ विकेट्स गमावत पूर्ण केले. हा गुजरातचा या हंगामातील सलग तिसरा विजय होता.

पराभवानंतर काय म्हणाला मयंक अगरवाल?
सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल (Mayank Agarwal) म्हणाला की, गुजरातविरुद्धचा सामना खूपच संघर्षमय होता. मात्र, त्याच्या संघाने खूपच मेहनत घेतली. रबाडा आणि अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली. यासोबतच त्याने असेही सांगितले की, तो ओडियनचे समर्थन करतो.

मयंक म्हणाला, “होय हा एक संघर्षपूर्ण सामना होता. आमच्या संघाने खूप संघर्ष केला. आम्ही ५-७ धावा मागे होतो, पण आम्ही सुरुवातीनंतर त्या व्यवस्थित मिळवू शकलो. आमच्यासाठी खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी होत्या. इतक्या साऱ्या विकेट्स गमावल्यानंतर स्वत:ला त्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी खरंच चांगली कामगिरी केली आहे, त्यासाठी मी खूप खुश आहे.”

रबाडा आणि अर्शदीपची प्रशंसा करताना मयंक म्हणाला की, “रबाडा आणि अर्शदीपने चांगली कामगिरी केली. सामना खेचण्यात त्यांनी चांगला प्रयत्न केला.”

ओडियन स्मिथबद्दल (Odean Smith) बोलताना तो म्हणाला की, “शेवटच्या षटकात असे कोणासोबतही होऊ शकते. आम्ही ओडियनचे समर्थन करतो. आम्ही १००% त्याच्यासोबत आहोत. क्रिकेटमध्ये असे क्षण नेहमी येत असतात आणि शेवटच्या षटकात असा खेळ असेल, तर सामना कोणाच्याही बाजूने जाऊ शकतो. जर त्याचा दिवस खराब आहे, तर त्याचा दिवस खराबच आहे. चिंता करण्याची कोणतीही बाब नाही.”

पंजाब किंग्सची आयपीएल २०२२मधील कामगिरी पाहिली, तर संघाने ४ सामने खेळले असून त्यातील २ सामन्यात विजय, तर २ सामन्यात पराभव मिळाला आहे. गुणतालिकेतील स्थानाबद्दल बोलायचं झालं, तर ते सहाव्या स्थानी आहेत.

एकेवेळी व्हिडीओ गेमच्या नादी लागलेला अकोल्याचा वाघ ‘दर्शन नळकांडे’ आयपीएल गाजवण्यास सज्ज

IPL2022| बेंगलोर वि. मुंबई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

IPL2022| चेन्नई वि. हैदराबाद सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---