विराट कोहलीने आयपीएल २०२२ नंतर आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजिनामा दिला आहे. तो सध्या क्रिकेटच्या कोणत्याच प्रकारात भारतीय संघा कर्णधार नसून तो एक फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या १५ व्या हंगामात चाहत्यांच्या कोहलीकडून एक फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. कोहली २०२२ च्या आयपीएलमध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल याबद्दल माजी भारतीय सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी आपले मत मांडले आहे.
माजी भारतीय कर्णधार म्हणाले की, “राॅयल्स चॅलेंजर्स बॅंगलोरचा कर्णधार बदलल्यानंतर आता आयपीएलमध्ये विराट कोहलीचे प्रदर्शन २०१६ च्या हंगामासारखे पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये त्याने ९०० हून अधिक धावा केल्या होत्या. रविवारी( २७ मार्च) आरसीबी जेव्हा आपला पहिला सामना पंजाब किंग्ससोबत मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळेल तेव्हा सर्वांच्या नजरा कोहलीवर इसणार आहेत, तो या हंगामात एक खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे.”
सुनिल गावसकरांनी स्टार स्पोर्टससोबत बोलताना सांगितले की, आम्हाला माहित नाही की पुढे कोहली पुन्हा संघाचे नेतृत्व करणार की नाही? कधी कधी खेळाडूला संघाच्या जबाबदारीतून वेळ मिळतो, तेव्हा तो चांगली कामगिरी करतो. कारण तो इतर १० खेळाडूंबाबत विचार करत असतो.
ते म्हणाले की, “जेव्हा तूम्ही कर्णधार असता तेव्हा तुम्ही इतर १० खेळाडूंबद्दल विचार करत असता आणि कधी कधी आपल्या संघातील इतर सदस्यांबाबत सुद्धा विचार करत असता. त्यांची खेळी किंवा त्यांची खराब खेळी आणि ते कोणत्या गोष्टी योग्य़ करत नाहीत, ते हे बरोबर कधी करणार? हे संघासाठी बरोबर असेल का? या सर्व गोष्टींबाबत तुम्ही विचार करत असता.”
गावसकर पुढे म्हणाले, “या हंगामात आपल्याला २०१६ च्या हंगामातील कोहली पाहायला मिळू शकतो, ज्यामध्ये त्याने जवळ-जवळ १००० धावा केल्या होत्या.” आरसीबीचा कर्णधार म्हणून फाफ डु प्लेसीसची नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
स्मिथचा जबरदस्त कॅच, पण डीआरएसची ‘गुगली’ अन् बाद होऊनही नाबाद राहिला आझम- Video
Video: मुंबई इंडियन्सचे सरप्राईस पाहून आठवणीत रमला सचिन तेंडुलकर; विनोद कांबळीचीही खास प्रतिक्रिया