---Advertisement---

काय सांगता! आयपीएल २०२२ पूर्वीच दिल्ली कॅपिटल्सचा ‘हा’ स्टार खेळाडू क्रिकेटला ठोकणार रामराम?

On: गुरूवार, मार्च 17, 2022 9:39 PM
Delhi-Capitals
---Advertisement---

जगभरातील सर्वांची आवडती आणि मोठी असलेली टी२० लीग इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. आयपीएलच्या १५व्या हंगामात १० संघ खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे आता किताब जिंकण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. आयपीएलने अनेक खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी दिली आहे. त्यामुळे खेळाडूंनी शानदार प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघातही आपले स्थान मिळवले आहे. मात्र, काही खेळाडू असेही आहेत, ज्यांना आयपीएल २०२०मधील खराब प्रदर्शनामुळे भारतीय संघातून बाहेर पडावे लागले आहे. अशातच, भारतीय संघाच्या स्टार खेळाडूला आयपीएलमध्ये संधी मिळू न शकल्याने त्याची कारकीर्द धोक्यात आली आहे. त्यामुळे असे तर्क लावले जात आहेत की, तो लवकरच क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो.

क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो हा गोलंदाज
खरं तर, मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) खेळणारा भारतीय संघाचा धाकड फलंदाज इशांत शर्माची (Ishant Sharma) कारकीर्द धोक्यात आहे. एकेकाळी इशांत भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी विभागातील सर्वोत्तम गोलंदाज होता. मात्र, त्याला खराब प्रदर्शनामुळे संघातील स्थान कायम ठेवण्यात अपयश येत आहे. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माही इशांतला संघात स्थान देण्याबाबत विचार करत नाहीये.

लवकरच घेऊ शकतो मोठा निर्णय
सध्या भारतीय संघाकडे मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांसारखे वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे निवडकर्तेही इशांतकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे इशांतसाठी सर्वच दरवाजे बंद झाले आहेत. त्याने भारतीय संघाकडून शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर २०२१मध्ये खेळला होता. मात्र, त्यामध्ये इशांतला एकही विकेट आपल्या नावावर करता आली नव्हती. इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने फक्त ५ विकेट्स घेतल्या होत्या. अशात असे म्हणले जात आहे की, इशांत लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतो.

इशांत शर्माची आयपीएल कारकीर्द
आयपीएल २०२२च्या ऑक्शनमध्येही कोणत्याही संघाने इशांत शर्माच्या नावाला पसंती दिली नाही. त्याला कोणत्याही संघाने आपल्या ताफ्यात घेतले नाही. इशांतच्या आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने २००८ ते २०२१ दरम्यान एकूण ९४ सामन्यात ३७.०२ च्या सरासरीने ७३ विकेट्स घेतल्या आहेत. इशांतने आयपीएल २०१३मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्याने १६ सामन्यात १५ विकेट्स घेतल्या होत्या. मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना इशातने ३ सामन्यात फक्त १ विकेट घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तुझ्या आयुष्यात दुसरं कुणी आहे का?’, अश्विनला चहलचा प्रश्न; वाचा काय आहे भानगड

‘यंदा आमचे प्रदर्शन जोरदार दिसेल, आमच्याकडे खूप सक्षम संघ’, राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकाची हुंकार

कसोटीच्या चौथ्या डावात आत्तापर्यंत ८ यष्टीरक्षकांनी ठोकलीत शतके; पंत, डिविलियर्ससह आता रिजवानचेही नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---