पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करल्यानंतर नंतरच्या दोन्ही सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने आपली ताकद दाखवून देत विजय मिळवला. मुंबईने आयपीएल 2023 स्पर्धेच्या 22व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध वानखेडे स्टेडिअमवर 14 चेंडू शिल्लक ठेवून 5 विकेट्सने दमदार विजय मिळवला. या विजयात पहिल्या तिन्ही सामन्यात फ्लॉप ठरलेल्या सूर्यकुमार यादव याने शानदार कामगिरी केली. त्याच्या या खेळीमुळे मुंबईने सहजरीत्या विजय मिळवला. या विजयानंतर सूर्याने मोठी प्रतिक्रिया दिली.
या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 185 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 17.4 षटकात 5 विकेट्स गमावत 186 धावा केल्या आणि लक्ष्य पूर्ण केले. यासह स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. मुंबईच्या विजयात सूर्यकुमारने 25 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. त्यात 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता.
#ESADay done right! 💙#OneFamily #ESADay #MIvKKR #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @ril_foundation pic.twitter.com/MYHo7MKdp6
— Mumbai Indians (@mipaltan) April 16, 2023
सामन्यानंतर मुंबईचा प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने संघाच्या विजयामागील योजनेचा खुलासा केला. सूर्यकुमार म्हणाला की, “आमच्यात डगआऊटमध्ये चर्चा झाली होती की, मागील सामन्यातील लय कायम ठेवायची आहे. तसेच, खेळाडूंनीही तसेच करून दाखवले. मला सामन्याचा शेवट करायला आवडले असते, पण संघाने ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यामुळे मी खूप खुश आहे.”
त्याने पुढे सांगितले की, दुपारच्या वेळी खेळपट्टी सुकलेली वाटत होती आणि त्याच्या संघाने वानखेडेवर शानदार कामगिरी केली. यादरम्यान त्याने आपल्या फॉर्ममध्ये परतण्याबाबतही वक्तव्य केले. तो म्हणाला की, “दुपारी खेळपट्टी सुकलेली वाटत होती. मात्र, आमच्या फलंदाजांनी ज्याप्रकारे फलंदाजी केली, त्याने विरोधी संघाला कोणतीही संधी दिली नाही.”
तो पुढे म्हणाला की, “वानखेडेवर दिवसाच्या सामन्यात 160 किंवा 170ची धावसंख्या चांगली असते. मात्र, ईशान किशनने आम्हाला शानदार सुरुवात करून दिली. मी सुरुवातीचे सहा-सात चेंडूत क्रीझवर जम बसवण्यासाठी घेतले आणि विचार केला की, जर एकदा सेट झालो, तर धावा करू शकतो. आम्हाला माहिती आहे की, वरच्या फळीने चांगली सुरुवात केली, तर खालच्या फळीत एकापेक्षा एक धाकड खेळाडू उपस्थित आहेत.”
सूर्यकुमारने अनुभवी फिरकीपटू पीयुष चावला याचीही जोरदार प्रशंसा केली. त्याने मोठ्या धावसंख्येच्या खेळात फायदेशीर गोलंदाजी केली. चावलाना 4 षटके गोलंदाजी करताना 19 धावा खर्च करत 1 विकेट घेतली. सूर्या म्हणाला की, “पीयुष चावलाने चांगली गोलंदाजी केली. त्याने दबावाच्या स्थितीत चांगली गोलंदाजी केली.”
खरं तर, मुंबईचा हा 4 सामन्यातील दुसरा विजय ठरला. मुंबईने 4 गुणांसह आयपीएल 2023 स्पर्धेच्या गुणतालिकेत आठवे स्थान मिळवले आहे. (ipl 2023 cricketer suryakumar yadav reveals mumbai indians winning plan against kkr)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिन-अर्जुन तेंडुलकरच्या आधी किती बाप-लेक खेळलेत आयपीएल? वाचा थोडक्यात
आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीच्या दुखापतीविषयी धक्कादायक ब्रेकिंग! बॅटिंग कोच स्पष्टच म्हणाला…