---Advertisement---

निसर्गाच्या खेळीने पंजाब-कोलकाता सामना झाला रद्द; मॅच झाली टाय

---Advertisement---

आयपीएल 2025 चा 44 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात ईडन गार्डन्स येथे जोरदार वादळ आणि पावसामुळे थांबवावा लागला. सततच्या पावसामुळे अखेर सामना रद्द करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर पंजाब किंग्जच्या संघाने चार विकेट गमावून 201 धावा केल्या. त्यानंतर 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाता संघाने वादळ सुरू झाले तेव्हा फक्त एक षटक खेळले होते. त्यानंतर हलका पाऊसही सुरू झाला. जोरदार वादळामुळे मैदानातील कर्मचाऱ्यांना कव्हरने मैदान झाकण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले.

वादळ आणि पावसामुळे कोलकातामध्ये सामना थांबेपर्यंत, कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच केकेआर संघाने एका षटकात कोणतेही नुकसान न होता स्कोअरबोर्डवर सात धावा टाकल्या होत्या. सुनील नारायण चार आणि रहमानउल्लाह गुरबाज १ धाव घेऊन क्रीजवर उपस्थित होते.

तत्पूर्वी, पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात खूपच चांगली झाली. सलामीवीर प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. प्रभसिमरन सिंगने 83 तर प्रियांश आर्यने 69 धावा केल्या. प्रियांशने 35 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार मारले तर प्रभसिमरनने 49 चेंडूत 83 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर 16 चेंडूत 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 25 धावा काढत नाबाद राहिला.

अशाप्रकारे, पंजाब किंग्ज संघाला चार विकेटसाठी 201 धावा रचण्यात यश आले. कोलकाताकडून वैभव अरोराने गोलंदाजीत 34 धावांत दोन विकेट घेतल्या. त्यानंतर, कोलकात्याच्या डावाची सुरुवात झाल्यानंतर लगेचच मैदानात वादळ आले आणि काही वेळातच पाऊस सुरू झाला. परिणामी रात्री 9.35 च्या सुमारास सामना थांबवावा लागला. पाऊस आणि वादळामुळे सामना 1 तास 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ थांबल्यानंतर, किमान 5 षटकांच्या खेळासाठी कट-ऑफ वेळ रात्री 11:44 अशी अपडेट आली. मात्र, संततधार पावसामुळे सामना रात्री 11 वाजताच्या सुमारास रद्द करण्यात आला. अशाप्रकारे, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण वाटून घ्यावा लागला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---