आयपीएल 2025 मध्ये आज ( 21 मे) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक रोमांचक सामना होणार आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना निर्णायक ठरेल. तीन संघांनी आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता शेवटच्या स्थानासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात स्पर्धा आहे. हार्दिक पांड्याचा संघ सध्या 12 सामन्यांतून 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दिल्ली 12 सामन्यांतून 13 गुणांसह थोडा मागे आहे. जर मुंबईने विजय मिळवला तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.
दिल्ली कॅपिटल्सला पात्र होण्यासाठी दोन्ही सामने जिंकावे लागतील. दरम्यान, आज पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस मुंबई आणि कोकण क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा जारी केला आहे. मंगळवारी रात्री मुंबईत भरपूर पाऊस पडला. त्यामुळे दिल्लीचे सराव सत्र पूर्ण होऊ शकले नाही.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 22 मे रोजी पावसाची 80% शक्यता आहे. सकाळी 10 वाजता 62% पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यानंतर 11 वाजता 71% पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारी 12 वाजता पावसाची शक्यता 49% पर्यंत कमी होते. चांगली बातमी अशी आहे की संध्याकाळी हवामान चांगले राहण्याची अपेक्षा आहे. संध्याकाळी 6 वाजता फक्त 16% पाऊस पडण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत पावसाची शक्यता 7 ते 8% दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे, जे चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे.
बीसीसीआयने पावसाच्या पार्श्वभूमीवर नियमांमध्येही बदल केले आहेत. याआधी आयपीएलच्या गट फेरीच्या सामन्यांमध्ये पाऊस पडल्यास एक तासानंतर षटकांचा कट सुरू होत असे. आता ते दोन तासांपर्यंत वाढवण्यात आले आहे. म्हणजेच जर सामना 9.30 च्या आधी सुरू झाला तर षटकांमध्ये कोणताही कट होणार नाही.






