---Advertisement---

बुमराहची ऑस्ट्रेलियात मोठी कामगिरी, दुसऱ्या महायुद्धानंतर हा पराक्रम करणारा केवळ दुसराच गोलंदाज!

---Advertisement---

ऑस्ट्रेलियात जे यापूर्वी घडलं नव्हतं, ते जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं करून दाखवलं आहे. पर्थ येथे झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियन भूमीवर टीम इंडियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय (धावांच्या बाबतीत) आहे.

भारताच्या या विजयाचा हिरो राहिला कर्णधार जसप्रीत बुमराह! त्यानं आपल्या धारदार गोलंदाजीनं कांगारू फलंदाजांना खिळवून ठेवत ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावला. बुमराहनं या सामन्यातील पहिल्या डावात ‘फाईव्ह विकेट हॉल’ सह एकूण आठ बळी घेतले. यासह त्यानं अशी कामगिरी केली, जी गेल्या 80 वर्षांतच फक्त सर रिचर्ड हॅडली यांनीच केली आहे.

पहिल्या कसोटीत आठ विकेट्स घेऊन बुमराहनं ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत रविचंद्रन अश्विनला मागे टाकलं. या बाबतीत कपिल देव (51) आणि अनिल कुंबळे (49) दुसऱ्या स्थानावर आहेत. पर्थ कसोटीत घेतलेल्या 8 विकेट्ससह बुमराहच्या ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळल्या गेलेल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये बळींची संख्या 40 वर गेली आहे. अश्विन ऑस्ट्रेलियात 39 बळी घेत चौथ्या स्थानावर आहे. पण बुमराहनं ऑस्ट्रेलियात जी कामगिरी केली, ती केवळ भारतीयच नाही, तर कोणताही आशियाई गोलंदाज करू शकलेला नाही.

दुसऱ्या महायुद्धानंतर (1945) ऑस्ट्रेलियात किमान 30 बळी घेतलेल्या शंभर गोलंदाजांमध्ये बुमराह सर्वोत्तम सरासरीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर रिचर्ड हॅडली यांची ऑस्ट्रेलियातील सरासरी 17.83 आहे. म्हणजेच त्यांनी प्रत्येक 17.83 धावांनंतर विकेट घेतली. तर बुमराहनं ऑस्ट्रेलियन भूमीवर प्रत्येक 18.40 धावांनंतर विकेट घेतली आहे. ही कामगिरी तो किती महान गोलंदाज आहे हे सांगण्यासाठी पुरेशी ठरते.

हेही वाचा – 

सीएसकेचा स्टार गोलंदाज मुंबईकडून खेळणार! 18 वर्षीय खेळाडूवर खर्च केले कोट्यावधी रुपये
भुवी-कोहली एकत्र खेळणार! दिग्गज गोलंदाज आरसीबीच्या ताफ्यात
IPL 2025 : अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ अनसोल्ड! विल्यमसनलाही खरेदीदार मिळाला नाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---