भारतातील प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी २०२१-२२ चा (Ranji Trophy 2021-22) उप उपांत्यपूर्व सामना (Ranji Trophy Pre-Quarter Final) झारखंड विरुद्ध नागालँड (Jharkhand vs Nagaland) यांच्यात झाला. हा महत्त्वपूर्ण सामना अनिर्णीत सुटला. मात्र झारखंड संघाने या सामन्यात तब्बल १००० पेक्षा जास्त धावांची आघाडी घेत रचला आहे. तसेच त्यांनी उपांत्यपूर्व फेरीतही धडक मारली आहे.
या सामन्यात नागालँडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. परिणामी झारखंडचा संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. झारखंडकडून पहिल्या डावात कुमार कुशाग्र याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने २७० चेंडूंचा सामना करताना २६६ धावा केल्या होत्या. त्याने या खेळीदरम्यान २ षटकार आणि ३७ चौकार मारले होते. त्याच्याबरोबर विराट सिंग आणि शाहबाज नदीम यांनीही शतकी खेळी केली होती.
नदीमने १७७ धावा आणि विराटने १०७ धावा जोडल्या होत्या. याखेरीज खालच्या फळीत राहुल शुक्ला याने नाबाद ८५ धावांचे योगदान दिले. परिणामस्वरूप झारखंड संघाने पहिल्या डावात २०३.४ षटके फलंदाजी करताना ८८० धावा जोडल्या होत्या. या डावात नागालँडकडून इमलीवती लेमतुर याने ४ तर ख्रिवित्सो केन्सने ३ विकेट्स घेतल्या होत्या.
झारखंडच्या या भल्यामोठ्या ८८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नागालँडचा संघ २८९ धावांवरच सर्वबाद झाला होता. नागालँडकडून यष्टीरक्षक चेतन बिष्टने एकाकी झुंज दिली होती. तो २५३ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने १२२ धावांवर नाबाद राहिला. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही आणि १०३.३ षटकातच नागालँडचा संघ गारद झाला.
Presenting the #RanjiTrophy 2021-22 Quarterfinalists! ???? ????@Paytm pic.twitter.com/l2VNBSaL5g
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 16, 2022
पुढे झारखंडने ५९१ धावांनी मागे असलेल्या नागालँडला फॉलोऑन न देता पुन्हा मैदानावर उतरण्याचे ठरवले. त्यांनी पाचव्या दिवसाखेर ९०.३ षटके खेळताना ६ विकेट्सच्या नुकसानावर ४१७ धावा जोडल्या. या डावात झारखंडकडून अनुकूल रॉयने दीडशतकी खेळी केली. त्याने ७ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने १५३ धावा जोडल्या. तसेच सलामीवीर उत्कर्ष सिंगने ७३ धावा आणि नझीम सिद्दीकीने ४२ धावांचे योगदान दिले. तर पहिल्या डावातील द्विशतकवीर कुमार कुशाग्र या सामन्यात ८९ धावांवर बाद झाला.
अशाप्रकारे झारखंडने सामन्याच्या शेवटच्या दिवसाखेर नागालँडवर चक्क १००८ धावांची आघाडी घेतली. यासह झारखंडचा संघ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० पेक्षा धावांची आघाडी घेणारा पहिलावहिला आणि एकमेव संघ ठरला आहे. त्यांच्यापूर्वी आजवर कोणत्याही संघाला हा जबरदस्त पराक्रम जमलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी इतिहासात कर्णधार बाबर आझमचे नाव सुवर्णक्षरात! धोनी, कोहली जवळपास पण नाही
व्हीबीएसपी जौनपूर आणि पुणे विद्यापीठ उपांत्य फेरीत
बाबर आझमची रेकॉर्डब्रेक खेळी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९६ धावांची खेळी करताना रचले ३ मोठे विक्रम