इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळवणारा आणि २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धीना आश्चर्यचकित करणारा जोफ्रा आर्चर भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. परंतु, भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळले त्याच्यासाठी अगामी भारताविरुद्धची कसोटी मालिका कठीण आव्हान असेल. केवळ आयपीएलच्या अनुभवावर ही मालिका खेळायची नसून त्यासाठी योग्य डावपेच देखील त्याला आखावे लागणार आहेत. याबाबत त्याने आपले मत व्यक्त केले आहे.
५ फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. त्याआधी जोफ्रा आर्चर याने एका पत्रकार परिषदेत सांगितले कि, भारतीय संघात खूप अनुभवी आणि उत्कृष्ट फलंदाज आहेत, ज्यात सलामवीर रोहित शर्मापासून ते रिषभ पंत यांचा समावेश आहे. त्यामुळे ६व्या क्रमांकापर्यंत कोणीही शतक झळकावू शकतात. भारताच्या ह्या फलंदाजांपासून इग्लंडला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.’
अन्य इंग्लंड संघातील खेळाडूंच्या अगोदरच भारतात आला होता आर्चर
इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्यात जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स आणि इंग्लंडचा सलामवीर फलंदाज रॉरी बर्न्स याला विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे या खेळाडूंनी इंग्लंडचा पूर्ण संघ श्रीलंकेतून भारतात पोहोचण्याच्या अगोदरच काही दिवस चेन्नईत आपली हजेरी देखील लावली होती. आर्चरने या अगोदर भारतात खूप आयपीएल सामने खेळले आहेत. परंतु, यंदाची त्याची भारतातील पहिलीच कसोटी मालिका असून त्याने त्यावर त्याने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
आपल्या इग्लंडच्या संघाविषयी बोलताना तो म्हणाला की ‘आमचा संघ देखील फार मजबूत आहे आणि प्रत्येकजण हे आपापल्या अचूक क्षमतेनुसार आणि नियोजनानुसार गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असतो, त्यामुळे आमच्या संघातील गोलंदाजांनी सुद्धा अचूक आणि चांगली कामगिरी करतील. संघात तीन वेगवान गोलंदाज असल्याने मला जास्त काळ गोलंदाजी करायला लागणार नाही, असे वाटते.’
महत्त्वाच्या बातम्या –
निवृत्ती घेतल्यानंतर डिंडाने मानले सौरव गांगुलीचे आभार; म्हणाला, ‘दादाने मला नेहमीच…’
भारत-पाकिस्तान सामन्यात खेळताना असे वाटते युद्ध लढायला चाललो आहोत, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूचे भाष्य
दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले…