---Advertisement---

‘वैभव सूर्यवंशीच मोडेल माझा विक्रम’; टी-20चा किंग बनताच जाॅस बटलरची मोठी भविष्यवाणी

On: गुरूवार, ऑगस्ट 6, 2026 9:10 AM
---Advertisement---

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनल्यानंतर, इंग्लंडचा स्टार फलंदाज जाॅस बटलरने भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीबद्दल एक धाडसी भाकीत केले. बटलरने विश्वास व्यक्त केला की, वैभव सूर्यवंशी भविष्यात टी20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा त्याचा विक्रम मोडू शकतो.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर ‘द हंड्रेड’ (The Hundred) स्पर्धेच्या प्रसारकांशी बोलताना बटलर म्हणाला, “टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनणे ही माझ्यासाठी अत्यंअभिमानाची गोष्ट आहे. तरीही, एक दिवस कोणीतरी हा विक्रम नक्कीच मोडेल आणि तो खेळाडू कदाचित वैभव सूर्यवंशी असू शकतो. या यादीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी पोलार्डला मागे टाकणे ही माझ्यासाठी खूप खास गोष्ट आहे.”

चेंडूचा सामना करण्यापूर्वी खांदे हलवण्याच्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सवयीबद्दल बोलताना बटलर म्हणाला, “अनेक वर्षांपूर्वी, एका प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार, अधिक मोकळेपणाने आणि तणावमुक्त वाटण्यासाठी मी ही सवय अंगीकारली. कालांतराने, ती माझी ओळख बनली.”

बटलरने आपल्या खराब फॉर्मशी असलेल्या संघर्षावरही भाष्य केले. तो म्हणाला, “क्रिकेटमध्ये परिस्थिती किती वेगाने बदलते, हे खरोखरच उल्लेखनीय आहे. काही दिवस सर्व काही बिघडते, तर काही दिवसांत तुम्ही सर्वोत्तम खेळ करता. काही महिन्यांपूर्वी मी खराब फॉर्मशी झुंज देत होतो, पण गेल्या काही आठवड्यांत मला असे वाटते की मी माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम लयीत फलंदाजी करत आहे. अशा वेळी केवळ दोनच पर्याय असतात: हार मानणे किंवा पूर्ण ताकदीनिशी पुनरागमन करणे. मी दुसरा पर्याय निवडला आणि त्यात यशस्वी झालो.”

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये शानदार कामगिरी केली, त्याने स्पर्धेत सर्वाधिक 776 धावा केल्या आणि ‘ऑरेंज कॅप’ जिंकली. त्यानंतर, त्याला भारताच्या टी20 संघात स्थान मिळाले.

मात्र, आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सहा आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये, आयपीएलमध्ये दाखवलेली सातत्यपूर्ण कामगिरी त्याला पुन्हा करता आलेली नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात त्याने 19 चेंडूत 50 धावांची स्फोटक खेळी केली होती. दुसऱ्या सामन्यात मात्र, 9 चेंडूत 20 धावा करून तो बाद झाला. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्याने संयमी फलंदाजी केली आणि 49 चेंडूंत 81 धावांची शानदार खेळी साकारली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---