क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध नावांमध्ये सचिन तेंडुलकर याचा समावेश होतो. त्याने ५५० पेक्षा अधिक क्रिकेट सामन्यात खेळताना ३४ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. जगातील अनेक महत्वाची मैदाने त्याने आपल्या फलंदाजीने गाजवली आहेत. त्याचे अनेक चाहते असून त्याचा आदर्श पुढे ठेवत अनेक युवा खेळाडूंनी क्रिकेट पर्याय निवडला आहे. त्यातच सचिनने पाकिस्तानविरुद्ध अनेक उत्तम खेळी खेळल्या आहेत.
कराची येथे पाकिस्तान विरुद्ध भारत (PAKvsIND) यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यातील एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. २००६या काळात ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि सचिन (Sachin Tendulkar) यांच्यात संघर्ष दिसला. यावेळी अख्तर हा सचिनला बाद नाही, तर दुखापतग्रस्त करण्याच्या हेतूने गोलंदाजी करत होता, असे त्यानेच स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
“हे या घटनेचा मी पहिल्यांदाच उलगडा करत आहे. २००६च्या कसोटी सामन्यात मी हे मुद्दामच सचिनला जखमी करण्याच्या हेतूने धोकादायक गोलंदाजी करत होतो,” असे अख्तर म्हणाला
“इंजमामने मला योग्य रेषेत गोलंदाजी करण्यास सांगितले, पण मी त्याला म्हटले मला सचिनला चेंडू मारायचे आहे. एका वेळी त्याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला होता, मला वाटले गेला सचिन, पण जेव्हा मी व्हिडिओ पाहिला, तर तो चेंडू त्याच्या हेल्मेटवर लागला होता आणि त्याने डोके वाचवले होते. नंतर मी ठरवले कसे तरी करून मी याला जखमी करणार,” असे अख्तरने पुढे म्हटले आहे.
@shoaib100mph Pindi Express 💪 🔥
VS@sachin_rt
Bouncer 💯👌🔥🔥🔥 pic.twitter.com/IToupCZSvL— Sardar Waqas (@ImWaqasAhmed99) April 22, 2020
या मालिकेत भारतीय संघ राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळत होता. तिसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात सचिन लवकर बाद झाला, पण त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद आसिफ आणि अब्दुल रझ्झाक यांनी चांगली गोलंदाजी केली, तर आसिफने भारताच्या प्रमुख फलंदाजांना बाद करत अविश्वसनीय गोलंदाजी केली, असे मत अख्तरने मांडले. त्याने या सामन्यात एकूण सात विकेट्स घेतल्या.
हा सामना भारताने ३४१ या मोठ्या धावांच्या फरकाने गमावला. तत्पूर्वी इरफान पठाणने या सामन्यात सलमान बट, युनूस खान आणि मोहम्मद युसूफ यांना लागोपाठ बाद करत हॅट्रिक मिळवली, तर दुसऱ्या डावात युवराज सिंगने १२२ धावा केल्या होत्या. तीन सामन्यांची ही कसोटी मालिका पाकिस्तानने १-०ने जिंकली होती.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“जर गांगुलीने माझी साथ दिली नसती, तर त्याला कर्णधारपद सोडावे लागले असते”
मुलगा झोरावरच्या आठवणीने व्याकूळ झालेला ‘गब्बर’, भेटल्यानंतर कडकडून मारली मिठी, चाहतेही झाले व्यक्त
‘भारतात मला खूपच शाप दिले गेले, म्हणूनच…’ आयपीएल खेळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य