इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसनने कसोटी क्रिकेटला असलेला धोका अगदी थोडक्या शब्दात व्यक्त केला आहे. भविष्यात केवळ काही दिग्गज संघांनाच पाहायला प्रेक्षक येतील आणि तेवढ्यापुरतच क्रिकेट उरेल असा हा दिग्गज म्हणतो.
आपल्या ट्विटर केलेल्या एका पोस्टमध्ये केविन पीटरसन म्हणतो, ” कसोटी क्रिकेटच भविष्य…पुढील सात वर्षातील…. तेव्हा फक्त ऍशेस, इंग्लंड विरुद्ध भारत, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत याच कसोटी मालिका जिवंत राहतील. ”
https://twitter.com/KP24/status/898984036877697024
यात सर्वात जास्त यशस्वी कसोटी क्रिकेटसाठी केविन पीटरसनने भारतालाच पसंती दिली आहे. जवळजवळ ४ देशांबरोबर भारताच्या कसोटी मालिका लोक पाहतील अस पीटरसनला वाटत.
बाकी देशांमधील कसोटी क्रिकेटबद्दल वाईट अवस्था असल्याचंच या दिग्गज माजी क्रिकेटपटूला सांगायचं आहे.