---Advertisement---

‘कुत्र्याचे शेपटू कधीच सरळ होणार नाही,’ माजी क्रिकेटपटूचा पाकिस्तानवर निशाना

---Advertisement---

भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक आणि गव्हर्निंग काऊंसिलचे सदस्य सुरिंदर खन्ना यांनी द्विपक्षीय मालिकेबाबत पाकिस्तानवर निशाना साधला आहे. ते म्हणाले, जोपर्यंत पाकिस्तान सुधारत नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका (Bilateral Series) खेळली जाणार नाही. याबरोबरच त्यांनी म्हटले की, कुत्र्याचे शेपूट कधीच सरळ होऊ शकत नाही.

एका मुलाखतीदरम्यान खन्ना (Surinder Khanna) म्हणाले, “बऱ्याच काळापासून दोन देशातील संबंधांसाठी क्रिकेटचा गैरवापर केला जातोय. त्याकडे एक प्रकारचं डिप्लोमॅटचं हत्यार म्हणून पाहिलं जातंय. परंतु २० वर्षे जरी कुत्र्याचे शेपूट नळीमध्ये घालून ठेवले, तरीही ते सरळ काही होत नाही, पाकिस्तानची वृत्तीही तशीच आहे.”

“हा एक राजकीय मुद्दा असून तो सरकारने सोडवणे योग्य ठरेल. परंतु एक भारतीय म्हणून जोपर्यंत ते बदलत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवला नाही पाहिजे,” असे माजी यष्टीरक्षक खन्ना पुढे म्हणाले.

विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) संघात २००७ पासून एकही द्विपक्षीय कसोटी मालिका झालेली नाही. पण भारत- पाकिस्तानमध्ये २०१२ साली ३ सामन्यांची वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० द्विपक्षीय मालिका झाली होती. परंतु त्यानंतर हे दोन संघ द्विपक्षीय मालिकेत आमने सामने आलेले नाही. या दोन संघ मागील काही वर्षात केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आणि आशिया चषकात आमने-सामने आले आहेत

ट्रेंडिंग घडामोडी-

-चेन्नई सुपर किंग्जने भारतीय क्रिकेट संघाला दिले हे ४ अफलातून खेळाडू

-५ अशा घटना, जेव्हा मुलतानचा सुलतान सेहवाग थेट नडलाय पाकिस्तानच्या क्रिकेटर्सला

-म्हणून सुरेश रैना आहे जगातील सर्वात दिलदार व निस्वार्थी क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---