मुंबई । 2007 टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्तानच्या त्या पराभवाबद्दल इम्रान नजीर याने आता मोठे विधान केले आहे. तसेच नजीरने पाकिस्तानच्या पराभवाची कारणेही सांगितली आहे. भारताविरुद्ध टी२०च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यामधील पराभवाबद्दल आजीवन पश्चाताप केला जाईल, असे इम्रान नजीर याने सांगितले आहे.
यूट्यूब शॉवर बोलताना नजीर सांगितले की, माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा खेद असेल. तो म्हणाला, “माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ही गोष्ट मला त्रास देईल. वैयक्तिकरित्या सांगायचे झाले तर आयएसएलप्रमाणे मी एकट्याच्या जीवावर पाकिस्तानला सामना हा सामना जिंकून द्यायला पाहिजे होते. जर एखादा खेळाडू बॅटच्या मधोमध खेळत असेल तर त्याचा अर्थ त्याच्यात विश्वास आहे.”
पाकिस्तान दोन वेळा पराभूत झाला आहे
2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी -20 विश्वचषकात पाकिस्तानला भारतीय संघाविरुद्ध दोन पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या लीग सामन्यात सामना बरोबरीत झाला होता, पण भारताने बॉल आऊटमध्ये पाकिस्तानवर मात केली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. भारतासाठी शेवटचे षटक जोगिंदर शर्मा यांने टाकले होते. तो सध्या हरियाणा पोलिसात डीएसपी पदावर कार्यरत आहे.
या सामन्यात पाकिस्तानकडून इमरान नजीरने 158 धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरवात केली. तो 14 चेंडूत 33 धावा काढून बाद झाला. तो पुढे म्हणाला की, “मी चांगला खेळत होतो पण दुर्दैवाने धावबाद झालो आणि सामना पाकिस्तानच्या हातातून निसटला. असंख्य प्रेक्षकांसमोर अंतिम सामना खेळणे हा माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठा क्षण होता.”
इमरान नजीर पाकिस्तान संघासाठी तिन्ही प्रकारामध्ये खेळला आहे, पण दुखापतीमुळे तो जास्त दिवस खेळू शकला नाही.