मुंबई इंडियन्सच्या मालकीणने त्यांच्या सेलिब्रेशनद्वारे प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या सर्व संघांना इशारा दिला आहे की आता ते सहावी ट्रॉफी जिंकणार आहेत. बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. शिवाय संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. आता हंगामातील चारही संघ निश्चित झाले आहेत.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना वानखेडेच्या संथ खेळपट्टीवर 180 धावा केल्या. रोहित शर्मा (5), विल जॅक्स (21) आणि रायन रिकेल्टन (25) मोठी खेळी करू शकले नाहीत, 58 धावांवर तीन विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात 55 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. तिलक 27 धावा करून बाद झाला, त्यानंतर हार्दिक पांड्या 3 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण दुसऱ्या टोकावर सूर्यकुमार यादवने शानदार कामगिरी केली.
सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 73 धावा केल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ 121 धावांवरच कोसळला. मुंबईकडून गोलंदाजीत सँटनर आणि जसप्रीत बुमराह यांनी 3-3 बळी घेतले. मुंबईने दिल्लीचा 59 धावांनी पराभव करताच कॅमेरा एमआयच्या मालक नीता अंबानीकडे वळला.
Nita Ambani signalling, we are coming for the 6th Trophy!
— Dinda Academy (@academy_dinda) May 21, 2025
No need for other teams to play in the Tournament anymore… pic.twitter.com/UtgGPB1p7d
नीता अंबानींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी आकाश अंबानीसोबत बसून 6 बोटे उंचावताना दिसत आहेत, याचा अर्थ ते सर्व संघांना इशारा देत आहेत की आता एमआयचे डोळे सहाव्या विजेतेपदावर आहेत.
मुंबई इंडियन्स हा चेन्नई सुपर किंग्जसह संयुक्तपणे सर्वाधिक विजेता संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आता जर त्यांनी सहावे विजेतेपद जिंकले तर ते सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणारा एकमेव संघ बनेल.





