आयपीएल 2025 मधील 20व्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर परभूत केले. आरसीबीने तब्बल 10 वर्षांनंतर वानखेडेवर विजय मिळवला. टाॅस गमावून पहिल्या डावात खेळताना आरसीबीने 20 षटकात 221 धावा केल्या, प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 9 गडी गमावून 209 धावा केल्या. आशाप्रकारे आरसीबीने 12 धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात आरसीबीची अष्टपैलू कामगिरी पाहायल मिळाली. संघाने प्रथम फलंदाजी करत 221 धावांचा डोंगर उभा केला. ज्यात विराट कोहली (67) आणि रजत पाटीदार (64) यांनी अर्धशतके झळकावली. नंतर गोलंदाजी करताना आरसीबीने मुंबईच्या बाजूने झुकलेला सामना स्वत:च्या पारड्यात झुकवला. डेथ ओव्हर्समध्ये आरसीबीने गोलंदाजीत कमबॅक करत मुंबईला 209 धावांवर रोखले. फलंदाजी गोलंदाजी पाठोपाठ संघाने क्षेत्ररक्षणात देखील अप्रतिम कामगिरी केली. डेथ ओव्हरर्समध्ये संघाने 5 अप्रतिम झेल घेतल्या.
शेवटच्या षटकात 19 धावांची गरज असताना कृणाल पांड्याने गोलंदाजी स्वीकारली. अन् त्याने या धावसंख्येचा बचाव केला. त्याने पहिल्या 2 चेंडूवर दोन विकेट्स घेतल्या. पहिल्या चेंडूवर मिचेल सँटनर झेलबाद झाला. दुसऱ्या चेंडूवर दीपक चहरने देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण तो षटकार मारण्यात अपयशी ठरला, सीमारेषावर फिलीप साॅल्ट आणि टिम डेव्हिड यांनी भागीदारीत झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ-
PHIL SALT PULLED OFF SOMETHING INCREDIBLE AT WANKHEDE. 🤯pic.twitter.com/dnVCaAiYZr
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 7, 2025
मुंबई इंडियन्सना 20 षटकांत 9 गडी गमावून फक्त 209 धावा करता आल्या. अशाप्रकारे, तिलक वर्माचे जलद अर्धशतक आणि हार्दिक पांड्याची धडाकेबाज खेळी वाया गेली. त्याच वेळी, आरसीबीने 10 वर्षांनंतर वानखेडेवर मुंबईला हरवण्यात यश मिळवले. यापूर्वी 2015 मध्ये आरसीबीने मुंबईविरुद्ध विजय मिळवला होता.