ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात कृणाल पंड्याच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला. या सामन्यात त्याने ४ षटकांत तब्बल ५५ धावा दिल्या.
त्याची हीच गोलंदाजी भारतीय संघाला अतिशय महागात पडली. आॅस्ट्रेलियाने सामना पावसामुळे थांबण्यापुर्वी १६.१ षटकांत ३ बाद १५३ धावा केल्या.
यामुळे कृणालच्या नावावर एक नकोसा विक्रम मात्र झाला आहे.
-भारतीय गोलंदाजाने टी२०मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध दिलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. यापुर्वी इशांत शर्माने २०१३मध्ये ४ षटकांत ५२ धावा दिल्या होत्या.
-भारताकडून टी२०मध्ये एका डावात गोलंदाजाने दिलेल्या या तिसऱ्या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. यापुर्वी युझवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६४ तर जोगिंदर शर्माने इंग्लंडविरुद्ध ५७ धावा दिल्या होत्या.
-आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी२०मध्ये जगातील कोणत्याही गोलंदाजाने दिलेल्या या तिसऱ्या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा-
–११२९ खेळाडूंना न जमलेली गोष्ट भारताच्या कुलदीप यादवने आज करुन दाखवली
–पाकिस्तावरील विजयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा पंजाबी भांगडा, पहा व्हिडीओ
–१८ वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी वसिम जाफरची चाळिशीत कामगिरी
–आजच्या सामन्यात होणाऱ्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही