ब्रिस्बेन | भारताच्या बहुचर्चित आॅस्ट्रेलिया दौऱ्याला आज सुरुवात होत आहे. द गाबा, ब्रिस्बने येथे होत असलेल्या टी२० सामन्याने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.
तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील आजचा हा सामना भारतासाठी खूप अर्थांनी महत्त्वाचा आहे.
गेल्या १० वर्षांत आॅस्ट्रेलिया भारताविरुद्ध कधीही द्विपक्षिय टी२० मालिका जिंकली नाही. या टी२० मालिकेतही काही खास विक्रम होणार आहेत. त्यातील निवडक विक्रम असे-
१५- आजपर्यंत भारत- आस्ट्रेलियात १५ टी२० सामने झाले असुन यातील १० सामने भारताने तर ५ आॅस्ट्रेलियाने जिंकले आहेत.
१- या दोन देशांत झालेल्या सामन्यातील एक सामना पावसामुळे वाया गेला आहे. हा सामना १३ आॅक्टोबर २०१७ रोजी हैद्राबादला खेळवला जाणार होता.
६- भारत आजपर्यंत आॅस्ट्रेलिया देशात ६ सामने खेळला असून यातील ४ सामने जिंकला आहे. तर दोन सामन्यात संघाला पराभव पहावा लागला आहे.
४२३- आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावा. विराटने ११ डावात फलंदाजी करताना ६०.४२च्या सरासरीने ह्या धावा केल्या आहेत.
३४२- भारताविरुद्ध खेळताना आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजाने केलेल्या धावा. ८ डावात त्याने ४२.७५च्या सरासरीने ह्या धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–पुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार
–नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच
–अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल